Almatti Dam esakal
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर कर्नाटकच्या 'आलमट्टी'तून विक्रमी साडेतीन लाख क्युसेक विसर्ग; पुराचा धोका टळण्याची शक्यता?

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र सरकारकडून विनंती करून आलमट्टीतील विसर्ग वाढविला जात असल्याने दोन दिवसांत पाणी ओसरण्याचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

चिक्कोडी : पावसाची उघडीप असली तरी महाराष्ट्रातील धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे आलमट्टीत पाण्याची आवक वाढतीच आहे. त्यामुळे आलमट्टीतून (Almatti Dam) सोमवारी कमी केलेला विसर्ग पुन्हा वाढविला आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता तब्बल साडेतीन लाख क्युसेक विसर्ग सुरू केला आहे.

आलमट्टी जलाशयात सोमवारी तीन लाख क्युसेक पाणी वाहून येत असतानाही सोमवारी धरण प्रशासनाने सव्वातीन लाख असलेला विसर्ग घटविताना तो तीन लाख केला होता. त्यामुळे आवक आणि विसर्ग तेवढाच राहिल्याने कृष्णेला पुन्हा फुगवटा दिसून येत होता. सोमवारी काही भागात उतरलेले पाणी मंगळवारी किंचित वाढत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे सांगली, कोल्हापूर (Sangli, Kolhapur Flood) व चिक्कोडी विभागाची पुन्हा चिंता वाढली होती.

पावसाचे पाणी कमी असले तरी महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातील धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाणी विविध नद्यांतून आलमट्टीला वाहून येण्याचे प्रमाण वाढतच राहिले आहे. सोमवारी आवक आणि विसर्ग तितकाच ठेवला होता. सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर पाण्याची आवक वाढतच राहिल्याने आलमट्टीतून पुन्हा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अॅलर्ट जाहीर करून रात्री ८ वाजता साडे तीन लाख क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. सध्या आवक आणि विसर्ग यांच्यात ४० हजार क्युसेक पाण्याचा फरक आहे.

आलमट्टीतील विसर्गानंतर तेथे आता ६५ टीएमसीपर्यंत साठा खाली आला आहे. पाणी अधिक विसर्ग करून दोन लाखांच्या आतमध्ये आवक सुरू झाल्यावर धरणात पाणी साठा सुरू केला तरी आठवड्यात धरण पुन्हा शंभर टीएमसीपर्यंत भरू शकते, अशी पाण्याच्या आवकेची स्थिती आहे. त्यामुळे सध्या आलमट्टीचा विसर्गावर कोल्हापूर, सांगली, चिक्कोडी विभागातील पूर ओसरण्यास मदत होणार असल्याचे या भागातील लोकांचे मत आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारकडून विनंती करून आलमट्टीतील विसर्ग वाढविला जात असल्याने दोन दिवसांत पाणी ओसरण्याचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

जलाशयात ६८.०५३ टीएमसी पाणी

आलमट्टी जलाशयात शनिवारी २ लाख ४० हजारापर्यंत आवक होती. तेव्हा रात्री सव्वा तीन लाख विसर्ग केला होता. रविवारी संध्याकाळी २ लाख ६८ हजार इतकी आवक असतानाही विसर्ग सव्वा तीन लाख क्युसेक इतकाच होता. सोमवारी आलमट्टीत तीन लाख क्युसेक पाणी वाहून येत होते. तरीही विसर्ग कमी करून तीन लाख करण्यात आला होता.

मंगळवारी रात्रीपर्यंत ३ लाख ८ हजार ९६१ क्युसेक पाणी वाहून येत असल्याने विसर्ग विक्रमी साडेतीन लाख क्युसेक करण्यात आला आहे. शनिवारी ७४ टीएमसीपर्यंत असलेला पाणीसाठा रविवारी ६९.६४ टीएमसी इतका झाला होता. दोन दिवस आवकेपेक्षा अधिक पाणी सोडल्याने सोमवारी ६७.८५ टीएमसी (५५.१३) पाणीसाठा झाला होता. मंगळवारी पाणीसाठा कमी न होता तो थोडासा वाढताना ६८.०५३ टीएमसी (५५.२९ टक्के) झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT