Accident Terrible accident near Solapur 2 sisters killed on the spot in a collision with a goods truck sakal
सोलापूर

Accident: सोलापुरजवळ भीषण अपघात, मालट्रकच्या धडकेत सख्ख्या बहिणी जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

Latest Solapur News: हैदराबाद रोडवरून मुळेगाव रोडच्या दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघींना भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने मागून जोरात धडक दिली. या अपघातात ज्योती यशवंत बडगंची (वय ५७, रा. दाजी पेठ) व जयंती कमलाकर उदगिरी (वय ४३, रा. राजस्वनगर) या दोघी सख्ख्या बहिणी जागीच ठार झाल्या. जोडभावी पेठ पोलिसांनी मालट्रक जप्त केला आहे.

मुळेगाव रोडवरील चंदनकाटा परिसरातील मुळेगाव क्रॉस रोडवर गुरुवारी हा अपघात झाला. कामानिमित्त दोघी बहिणी दुचाकीवरून मुळेगावकडे निघाल्या होत्या. पण, त्यांच्यावर वाटेतच काळाने घाला घातला. हैदराबादच्या दिशेने भरधाव वेगाने

निघालेल्या मालट्रकचा (एमएच ०४, झेड २६३९) मागील बाजूचा कट दुचाकीला लागला. त्यात दोन्ही बहिणी दुचाकीवरून रस्त्यावर पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला, तोंडाला, सर्वांगाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर काहीवेळाने मदतनीस उमेश कांबळे यांनी ज्योती बडगंची यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर जयंती उदगिरी यांना पती कमलाकर यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शनिवारी पोलिसांत गुन्हा दाखल होईल. मालट्रक चालक सोलापूर शहरातीलच असून, त्याला अजून पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

Tirupati Laddu: तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर; दोषींवर होणार कठोर कारवाई

प्रो कबड्डी सीझन २ विजेता U Mumba संघ ११ व्या हंगामासाठी सज्ज; प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT