artificial intelligence Sakal
सोलापूर

Artificial Intelligence : ‘एआय’ अभियांत्रिकी पदवीचे यंदापासूनच प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शासकीय अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्याला प्रतिसाद देत याचवर्षी शासनावर कोणताही आर्थिक बोजा न टाकता आर्टीफिशियल इंटेलीजन्स व डाटा सायन्सची पदवी अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष सुरू करता येईल असे पत्र तंत्रनिकेतनने उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे प्रधान सचिवांना पाठवले आहे. एआयसीटीईची मान्यता मिळेपर्यंत अभ्यासक्रम सुरू करता येणे शक्य होणार आहे.

काही वर्षात शासकीय तंत्रनिकेतनचा कायापालट होऊ लागला आहे. सुविधाचे आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे. इमारतीची डागडुजी, बंद पडलेली मेस सुरू करणे, वृक्षारोपण आदी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील सोलापूरकरांसाठी शासकीय अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय मंजूर केले. शासकीय तंत्रनिकेतनच्या ३२ एकर जागेत आता पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयाची भर पडणार आहे.

पालकमंत्र्यांच्या घोषणेला प्रतिसाद देत तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून याच वर्षी अभियांत्रिकी पदवीचे प्रवेश सुरू करण्याबाबत कळवले आहे.

या पत्रानुसार अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयात शासनावर कोणताही आर्थिक बोजा न टाकता आर्टीफिशियल इंटेलिजन्स व डाटा सायन्स पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करता येईल. तंत्रनिकेतनमध्ये उपलब्ध असलेल्या लायब्ररी, वर्कशॉप, कांम्प्यूटरलॅब या सारख्या सुविधांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे.

त्यामुळे एआय व डाटा सायन्सच्या पहिल्या वर्षासाठी कोणताही आर्थिक ताण शासनावर येणार नाही. तसेच एआयसीटीईनंतर पूर्व लक्षी प्रभावाने मान्यता दिली तरी मुलांना यावर्षीच प्रवेश मिळून त्यांना शिक्षणाची संधी लगेच मिळू शकणार आहे.

पदवी अभ्यासक्रम शक्य

  • सर्व अध्यापनाच्या सुविधा उपलब्ध

  • यावर्षी प्रवेश मिळाले तर स्थानिक मुलांना शिक्षणाची संधी

  • शासनाच्या आश्वासनाची होणार पूर्तता

  • एआय व डेटा सायन्सच्या पदवीला सोलापुरात मोठी मागणी

  • खासगीच्या तुलनेत एआयचे शिक्षण अल्पदरात मिळणार

रत्नागिरी पॅटर्ननुसार प्रवेश प्रक्रिया शक्य

यापूर्वी रत्नागिरी येथे डीफार्मसी महाविद्यालय शासनाने सुरू केले. त्यास सुरवातीला फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाची मान्यता मिळण्यास उशिर झाल्याने मुलांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये म्हणून प्रवेश सुरू झाले. नंतर पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता मिळाली.

त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये म्हणून सोलापुरात तत्काळ अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयाचे प्रवेश सुरू करता येतील. एआयसीटीईची मान्यता मिळवून आणण्याची जबाबदारी आपण घेऊ असे या पत्रात प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनी म्हंटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT