Praniti shinde  sakal
सोलापूर

Solapur News : मताधिक्य नसल्यानेच भाजप निवडणुका घेत नाही; आमदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - जनतेने कौल दिलेले सरकार सध्या सत्तेवर नसून खोके अन्‌ इडीच्या धास्तीने लादलेले सरकार सत्तेवर आहे. भाजपला आपल्या बाजूने जनतेचा कौल (मताधिक्य) नसल्याची जाणीव झाल्यानेच महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी युवक काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चवेळी केली.

सोलापूर शहरातील पाणीप्रश्न, दिवाबत्ती, रस्त्यांवरील खड्डे, नळ कनेक्शन नसतानाही मनमानी कर आकारणी, सार्वजनिक नळ बंद अशा विविध प्रश्नांवर मंगळवारी (ता. २९) सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे भाजप सरकार आणि सोलापूर महापालिका प्रशासनाच्या विरोधात चार हुतात्मा पुतळ्यापासून महापालिकेवर हलगीनाद जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

आमदार प्रणिती शिंदे, युवकचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस दीपक राठोड, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली हा जनआक्रोश मोर्चा निघाला. पदाधिकाऱ्यांनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध केला.

दरम्यान, यावेळी आमदार प्रणिती शिंदेंनी भाजप सरकारवर घणाघाती टीका केली. याप्रसंगी वाहिद बिजापुरे, महेश लोंढे, महेश जोकारे, प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी, सुरेश हसापुरे, सुशीला आबुटे, अनुराधा काटकर, महिला शहराध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत वाडेकर, अनंत म्हेत्रे, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.

सतर्क राहा, निवडणुकांवेळी काहीतरी होवू शकते कांड

सणासुदीचे दिवस असतानाही रेशन दुकाने ओस पडली असून सर्वसामान्यांना साखर, धान्य तेथे मिळत नाही. सिलिंडरचे भाव वाढलेलेच असून देशात, राज्यात बेरोजगारी वाढली आहे. रेशन दुकानात रॉकेल मिळत नाही. तरीदेखील, मोदी सरकार केवळ आकडेवारीची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे.

सरकारची सामाजिक नव्हे केवळ राजकीय इच्छाशक्ती आहे. पण, नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असून आता मोदी सरकारच्या बाजूने जनमत नसल्याने काहीतरी कांड घडवून आणले जावू शकते. सत्तेसाठी जनतेस वेठीस धरणारे हे सरकार आहे. आता ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला मुंबईत इंडिया समेट होणार आहे. आम्ही आघाडीच्या माध्यमातून सत्तमाधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशाराही आमदार प्रणितींनी यावेळी दिला.

नागरिकांना आठ दिवसाआड पाणी, तेही अवेळी

सोलापूरकरांना नियमित पाणी मिळत नसून आठ आठ दिवसाला तेही अवेळी पाणी मिळत आहे. त्याचे कोणालाच देणेघेणे नाही. अनेकदा आंदोलने, मोर्चे काढूनही काही सुधारणा होत नाही. उजनीत पाणी असतानाही पाण्याचे नियोजन नीट नाही, आम्ही सत्तेत असताना दुष्काळातही दोन दिवसाआड पाणी दिले.

आता सार्वजनिक नळ बंद केले असून ज्यांच्याकडे नळ कनेक्शन नाही, त्यांनाही बिले दिली गेली आहेत. शहराचा विकास खुंटला असूनही भाजप सरकार निवडणुका घेत नाही, अशी टीका आमदार प्रणिती शिंदेंनी यावेळी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT