ujani dam sakal
सोलापूर

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

उजनी धरण १११ टक्के भरले असून, धरणात १२३ टीएमसी पाणी आहे. ४ ऑगस्टपासून कॅनॉलमधून सोडलेले पाणी मंगळवारी बंद होणार आहे. १५ ऑक्टोबरला धरणात जेवढा साठा असेल, त्याचे नियोजन करून आवर्तने निश्चित केली जातात. ऑक्टोबरअखेर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनांचा निर्णय होईल.

तात्या लांडगे

सोलापूर : सध्या उजनी धरण १११ टक्के भरले असून, धरणात १२३ टीएमसी पाणी आहे. ४ ऑगस्टपासून कॅनॉलमधून सोडलेले पाणी आता मंगळवारी (ता. १५) बंद केले जाणार आहे. १५ ऑक्टोबरला धरणात जेवढा साठा असेल, त्या पाण्याचे नियोजन करून आवर्तने निश्चित केली जातात. ऑक्टोबरअखेर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनांचा निर्णय होईल, पण १५ डिसेंबरनंतर शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे.

उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर ४ ऑगस्टपासून कॅनॉलमधून पाणी सोडण्यात आले. याशिवाय दहिगाव, सीना-माढा उपसा सिंचन योजनांमधूनही पाणी सोडण्यास सुरवात झाली. धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी देखील दररोज १६०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. आता केवळ कॅनॉलमधीलच पाणी सुरू असून, तेही आता १५ ऑक्टोबर रोजी बंद केले जाणार आहे. मागील अडीच महिन्यांपासून धरणातून पाणी सोडण्यात आले असून, समाधानकारक पाऊस झाल्याने ते पाणी नदीच्या दिशेनेच वाहून गेले.

आता पावसाळा संपल्याने धरणातून सोडले जाणारे सर्व पाणी बंद केले जाणार आहे. आगामी आठ महिन्यांचे पाण्याचे नियोजन आता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत पहिल्या आवर्तनाचा निर्णय होईल. मार्च-एप्रिलमध्ये दुसरे तर आवश्यकतेनुसार मे महिन्यात शेवटचे आवर्तन सोडले जाऊ शकते. त्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत काही दिवसांतच होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

उजनी धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • १२३.०५ टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा

  • ५९.३९ टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • ११०.८५ टक्के

  • कॅनॉलमधून सोडलेले पाणी

  • १००० क्यूसेक

सोलापूर शहरासाठी नदीतून पाणी नाहीच

सोलापूर ते उजनी धरण, अशी ११० किलोमीटरपर्यंत १७० एमएलडीची समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत ते काम पूर्ण होणार असून, कामाची मुदतही नोव्हेंबरअखेर आहे. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर सोलापूर शहराला भीमा नदीतून पाणी सोडणे बंद होणार आहे. दरवर्षी सोलापूर शहरासाठी साधारणत: २० टीएमसी पाणी सोडावे लागत होते आणि त्यामुळे पावसाळ्यात १०० टक्के भरलेले धरण उणे पातळीत जायचे. समांतर जलवाहिनीमुळे आता दरवर्षी ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर उणे (मायनस) होणारे धरण आता नेहमीच प्लसमध्ये राहील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT