Solapur Lok Sabha MP Praniti Shinde esakal
सोलापूर

Praniti Shinde : लोकसभेत तब्बल 65 हजारांचं मताधिक्य; मोहोळ तालुक्याच्या खासदार प्रणिती शिंदेंकडून अपेक्षा वाढल्या

राजकुमार शहा

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur-Pune National Highway) केंद्रबिंदू व राज्याच्या नकाशावरील तालुका म्हणून मोहोळचा परिचय आहे.

मोहोळ : सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना मोहोळ विधानसभा मतदार संघातून (Mohol Assembly Constituency) ना भूतो न भविष्यती असे 65 हजारांचे मताधिक्य मिळाल्याने मतदार संघातील नागरिकांच्या खासदार शिंदेंकडून अपेक्षा वाढल्या आहेत. येत्या पाच वर्षाच्या कालावधीत अपेक्षापूर्ती होईल का? अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे.

यापूर्वी सोलापूर लोकसभा मतदार संघातून (Solapur Lok Sabha Constituency) माजी खासदार सुशीलकुमार शिंदे, अॅड. शरद बनसोडे, जय सिद्धेश्वर महास्वामी अशी मान्यवर नेते मंडळी निवडून गेली आहेत. मतदारांनी त्यांना भरभरून सहकार्य ही केले. मात्र, मतदारांच्या पदरी निराशाच राहिली. साधे साधे प्रश्नही सुटले नाहीत. त्यामुळे मोहोळ विकासापासून कोसो दूर राहिले. प्रत्येकाने केवळ राजकारणासाठी वापर केला.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur-Pune National Highway) केंद्रबिंदू व राज्याच्या नकाशावरील तालुका म्हणून मोहोळचा परिचय आहे. उजनी कालवा, आष्टी तलाव, आष्टी उपसा सिंचन योजना या पाणी स्त्रोतामुळे तालुक्यात द्राक्ष, डाळिंब, पेरू, सिताफळ, केळी या फळबागांचे क्षेत्र वधारले आहे. शेतकरी चांगल्या प्रतीचा माल उत्पादित करू शकतो. मात्र, त्यावर होणारा कृषी प्रक्रिया उद्योग नसल्याने मोत्या सारखा माल मातीमोल दराने विकावा लागतो, त्यामुळे तालुक्यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारणे गरजेचे आहे, तरच शेतकरी टिकणार आहे.

तालुक्यात सुशिक्षित बेकारींची ही संख्या कमी नाही. त्यांच्या हाताला आज काम नाही. मोहोळला नैसर्गिक वातावरण चांगले असल्याने या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी नवीन पंचतारांकित औद्योगिक वसाहत होणे गरजेचे आहे, त्यामुळे युवकांची व्यसनाधीनता कमी होणार आहे व त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न मिटणार आहे. आमदार यशवंत माने यांनी रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधीचा विकास निधी आणला. मात्र, आजही शहराशी सर्व गावांना जोडणारे पक्के रस्ते नाहीत, ते होणे गरजेचे आहे.

मोहोळ तालुक्यातून जाणाऱ्या भीमा व सिना या नद्यांवर बंधारे झाले तर सिंचन वाढणार आहे. त्यामुळे चार साखर कारखाने क्षमतेने चालणार आहेत. मोहोळ शहरासह तालुक्यात व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. मोहोळला रेल्वे स्टेशन ही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धेश्वर एक्सप्रेस यासह अन्य लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबाव्यात यासाठी मोहोळवासियांनी विविध नेते व विभागाकडे निवेदनांचा पाऊस पडला आहे. मात्र, अद्याप या मागणीला यश आले नाही.

कोरोनाच्या आधी इतर लांब पल्याच्या रेल्वे गाड्या थांबत होत्या, मात्र कोरोनानंतर त्या थांबत नाहीत. रेल्वे थांबल्या तर व्यापारी सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत माल खरेदी करून परत येऊ शकतो, त्यामुळे व्यापार वृद्धी होणार आहे. बाजार पेठेतील उलाढाल वाढणार आहे. पुढील पंचवार्षिक निवडणुकीत आता मिळालेल्या मताधिक्यापेक्षा जादा मताधिक्याची अपेक्षा असेल, तर ही कामे होणे गरजेची आहेत, अन्यथा मतदारांना विचार करावा लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT