सुरक्षा अधिकारी प्रमोद सुरसे  sakal
सोलापूर

Solapur : उद्योग क्षेत्र 'शुन्य अपघात' करण्याचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : उद्योगामधील कामगारांची औद्योगीक सुरक्षा ही एक व्यवस्थापन, कार्यशैली व सावधानतेच्या आधारावर कार्यरत असते. त्यासाठी कामगारासह सर्व घटकांचे योगदान महत्वाचे ठरते. उद्योगात अपघात कसे टाळले जाऊ शकता याचे शास्त्रीय विश्लेषण समजावून घेत सुरक्षा साधनांचा प्रभावी वापर आवश्यक असते. या वापरासाठी औद्योगीक सुरक्षा विभाग महत्वाची भूमिका बजावतो असे मत औद्योगीक सुरक्षा अधिकारी प्रमोद सुरसे यांनी कॉफी विथ सकाळमध्ये व्यक्त केले.

औद्योगीक सुरक्षेचे उपक्रम

कामगार अधिनियम १९४८ व महाराष्ट्र कामगार नियम १९६३ या आधारावर औद्योगीक सुरक्षाविभाग काम करतो. कामगारांचे कल्याण, सुरक्षा व आरोग्य या तीनही मुद्दयांवर विभाग काम करतो. त्याच्या मदतीला कारखान्याची सुरक्षा कमिटी असते. कामगारांसाठी लॉकर, पाळणाघरे, लंचरूम आदी सुविधा असायला हव्यात.

आरोग्यामध्ये कामगाराच्या आरोग्य तपासणीला महत्व आहे. सुरक्षेमध्ये कारखाना व्यवस्थापनाने सर्व सुरक्षा साधने उपलब्ध करुन द्यावीत. या साधनांचा उपयोग कामगारांनी करुन शुन्य अपघाताचे उद्दीष्ट समोर ठेवून कार्य केले जाते. यामध्ये कामगार सुरक्षा उपक्रम, कामगार प्रशिक्षण, ४ मार्च ते ११ मार्च सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जाते.

तसेच वर्षातून दोन वेळा एमएएच (मेजर ॲक्सीडंट हॅझार्ड) म्हणजे जोखमीच्या उद्योगामध्ये मॉकड्रील करुन दिले जाते. याशिवाय राज्य शासनाने नारायण मेघाजी लोखंडे पुरस्काराने सुरक्षा नियमांचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट कारखान्यांना दिला जातो. धोकादायक कारखान्याचे सेफ्टी ऑडिट दर दोन वर्षांनी केले जाते.

प्रत्यक्षात काम करतानाची सुरक्षा महत्वाची

कामगारांना स्वयंम सुरक्षा साधनांचा (पीपीई) वापर करण्याचे आवश्यक आहे. यामध्ये हॅंड ग्लोव्ह्ज, फेस शिल्ड, गॉगल, हेल्मेट आदी साधनांचा नियमित उपयोग व्हावा. तसेच एसओपी (स्टॅंडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) नुसारच काम करण्याची सवय असावी. अतीघाई, अतिआत्मविश्वास, निष्काळजीपणा कामाच्या वेळी टाळून स्थीर मानसिकतेने काम करावे. कामावरील पर्यवेक्षकांनी कामगाराला काम करताना काय करावे व काय करु नये (डू ॲन्ड डोन्ट) याबाबत स्पष्ट सूचना, सुरक्षा साधनांचा वापर व कामगाराची मनस्थिती ओळखून धोकादायक कामे देण्याचा निर्णय घ्यायला हवा. धोकादायक कामाचे परमिट काढण्याची पध्दत असायला हवी.

अपघातांचे विश्लेषण समजून घ्यावे

सर्वसाधारण उद्योगांमध्ये होणाऱ्या अपघातांचे विश्लेषण केल्यास काही गोष्टी स्पष्ट होतात. सर्वसाधारण ८८ टक्के अपघात असुरक्षीत क्रीयेमुळे होतात. कामगारांनी सुरक्षा साधनाचा वापर न करता किंवा निष्काळजीपणातून अपघात होऊ शकतात. १० टक्के अपघात असुरक्षीत स्थितीमुळे होतात. यामध्ये लूज वायरींग, पुरेसा प्रकाश नसल्याने चुकीची क्रीया होणे, सुरक्षेची साधने उपलब्ध नसल्याने होतात. तर उर्वरीत २ टक्के अपघात हे मानवी आवाक्याबाहेर आहेत. हे विश्लेषण समजून घेतले तर उद्योगातील अपघात कशा पध्दतीने टाळले जाऊ शकतात हे स्पष्ट होते.

विभागाच्या नियमित सेवा

औद्योगीक सुरक्षा विभाग हा उदयोगांना लागणारे परवाने उपलब्ध करुन देतो. तसेच परवान्यांचे नुतनीकरण, नकाशे मंजुरी, सुधारणा, नवीन कारखाने नोंदणी, धोकादायक कारखांन्याची नोंदणी या प्रकारच्या सेवा उद्योग क्षेत्राला उपलब्ध करुन देते. तसेच या सेवा सध्या ऑनलाईन पध्दतीने देखील उद्योजकांना मिळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT