Ujani Dam Water Level Sakal
सोलापूर

Ujani Dam Water Level : मोठी बातमी! उजनी धरण 90 टक्क्यांवर; भीमा-सीना नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

22 जानेवारी 2024 रोजी उणे झालेले उजनी धरण 25 जुलैपर्यंत उणे पातळीतच होते. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 90 टक्क्यांपर्यंत आले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : 22 जानेवारी 2024 रोजी उणे झालेले उजनी धरण 25 जुलैपर्यंत उणे पातळीतच होते. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 90 टक्क्यांपर्यंत आले आहे. धरणातील एकूण पाणीसाठा आता 110 टीएमसी इतका झाला आहे. धरणात सध्या दौंडवरुन 75 हजार क्युसेकने पाण्याची आवक येत आहे.

त्यामुळे आता धरणातून डावा- उजवा कॅनॉल, बार्शी, दहीगाव उपसा सिंचन योजना, बोगदा, सीना नदीतून पाणी सोडले जाणार आहे. विसर्ग असाच राहिला किंवा यापेक्षा वाढला तर भीमा नदीतूनही पाणी सोडले जाईल, असे जलसंपदा विभागाने सांगितले आहे. भीमा, सीना नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा 46 टीएमसीपर्यंत (90 टक्क्यांपर्यंत) पोचला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झाला आहे.

पण, पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 100 टक्क्याकडे वाटचाल करीत असल्याची सद्य:स्थिती आहे. सध्या जेवढा अपेक्षित साठा पाहिजे, तेवढा आलेला आहे. दरम्यान, उजनी धरणावर पुणे, नगर, धाराशिव व सोलापूर अशा चार जिल्ह्यांच्या 42 पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

धरणाचा आधार असल्याने सोलापूर जिल्ह्यात केळी, डाळींब, ऊस अशा पिकांची वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 62 हजार हेक्टर जमिनीला उजनीतून थेट पाणी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात उजनी धरणाचा फार मोठा वाटा आहे.

आता धरणातून खाली पाणी सोडले जाणार आहे. पुण्यातील मुसळधार पाऊस, धरणातील पाणीसाठा आणि पावसाळा अजून 2 महिने असल्याने तसा निर्णय घेण्यात आला आहे. नदीतून सोडला जाणारा विसर्ग वाढविण्यापूर्वीच नदीकाठी असलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी घेऊन जाणे गरजेचे आहे. पुढे पाऊस अजून 2 महिने पडणार आहे.

गतवर्षी 66 टक्केच भरले अन्‌ उन्हाळ्यात उणे 60 टक्के झाले, आता...

गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला होता. पुणे जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे उजनी धरण 66 टक्केच भरले होते. उन्हाळ्यात उजनी धरणातील पाणीसाठा धरण झाल्यापासून पहिल्यांदाच उणे 60 टक्क्यांपर्यंत पोचला होता. पाऊस लांबला असता तर जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्र झाली असती, अशी परिस्थिती होती. पण, यंदा पावसाळा दोन महिने शिल्लक असतानाही पुण्यातील पावसामुळे उजनी एका महिन्यात 90 टक्क्यांपर्यंत भरले आहे.

अडीच कोटी युनिट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट

पावसाळ्यात चांगला पाऊस होईल आणि उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यावर खाली भीमा नदीतून पाणी सोडून दिले जाते. त्यावेळी धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पातून वीजेची निर्मिती केली जाते. गतवर्षी धरण ६६ टक्केच भरल्याने वीजनिर्मिती होवू शकली नाही.

यंदा अडीच लाख युनिट (अडीच मिलियन युनिट) वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. पुणे जिल्ह्यातून दौंड, बंडगार्डनवरून येणारा विसर्ग, शिल्लक पावसाचे दिवस (हवामान खात्याच अंदाज) व धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच अंदाज घेवून धरणातून नदीतून पाणी सोडले जाणार आहे.

त्यावेळी वीजनिर्मितीची प्रक्रिया सुरू होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. धरणात 90 टक्के पाणीसाठा झाल्यानंतर सोमवारपासून धरणातून खाली पाणी सोडले जाणार आहे. धरण सध्या 86 टक्के झाले आहे. धरणातील पाणी सोडताना तेथे असलेल्या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होईल.

ठळक बाबी...

  • अवघ्या 10 दिवसांत उजनी धरणात आले 46 टीएमसी पाणी

  • 25 जुलैपर्यंत उणे पातळीत असलेले उजनी धरण अवघ्या 10 दिवसातच 100 टक्के भरले

  • सोलापूर जिल्हा, उजनी धरण परिसरात समाधानकारक पाऊस नाही, तरी पुण्यातील धरणातून सोडलेल्या विसर्ग ठरला फायद्याचा

  • पुढील आठवड्यात उजनी धरणातील वीजनिर्मिती प्रकल्प सुरू होण्याची शक्यता; उजनी सोमवारी 100 टक्के भरणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidates: विधानसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, विद्यमान आमदाराचे कापले तिकीट; जाणून घ्या कुणाला मिळाली संधी?

Tasgaon Election : तब्बल 20 वर्षांनंतर आबा-काका गटांत 'टशन'; रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील यांच्यात थेट सामना

Ruturaj Gaikwad सोबत झाला मोठा गेम? टीम इंडियाची घोषणा होताच चर्चेला उधाण

Bhool Bhulaiyya 3 : भुलभुलैय्याच्या सॉंग प्रीमियरला कार्तिक - विद्याची मस्ती ; केमिस्ट्रीने जिंकली प्रेक्षकांची मनं

Latest Maharashtra News Updates : शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT