पिंपरी-चिंचवड

काळजी !

CD

काळजी !
नेतेमंडळींना राजकीय भविष्याची तर शेतकऱ्यांना पावसाची

शिरगाव, ता.२५ : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेतेमंडळींचा जोरदार प्रचार चालू असून त्यांना एकीकडे आपल्या प्रचार, मताधिक्य आणि राजकीय भविष्याची काळजी वाटत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना पावसाची चिंता लागून राहिली आहे. अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला; तर उन्हाळी मशागती कशा करायच्या ? आणि झालाच नाही; तर पेरणी कशाच्या जीवावर करायची ? या काळजीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे आणि सर्वच राजकीय पक्षांची नेतेमंडळी आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात मग्न आहेत. जनतेला आश्वासने देत असताना प्रचाराचा जोर कमालीचा वाढविला आहे. एकीकडे, जरी या नेत्यांना प्रचाराची आणि आपल्या राजकीय भविष्याची चिंता वाटत असली तरी शेतकरी पावसासाठी चिंताग्रस्त आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना खरीप हंगामाची चिंता आहे. सध्या अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर बरसला आणि मोसमात पाऊसच आला नाही; तर या चिंतेने शेतकरी भयभीत आहेत. सोसाट्याचा वादळवारा, विजांचा गडगडाटाने शेतकरी धास्तावलेला आहे. काही ठिकाणी उन्हाळी बाजरीची पिके नेस्तनाबूत झाली आहेत. तर सोमाटणेतील आंब्याच्या बागाचे मोठ्या नुकसान झाले आहे.

सांगा सरकार ! तुम्ही शेतकऱ्यांचे की व्यापाऱ्यांचे ?
निवडणूकीसाठी प्रचाराला येणारे नेतेमंडळी, कार्यकर्ते नेहमीप्रमाणे त्याच मुद्द्यांवर तीच आश्वासने देत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. पीककर्ज मिळत नाही. गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नापिकीचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. लागवडीचा खर्च निघाला नाही. तर काही ठिकाणी लागवडच झाली नाही. या आणि अशा बऱ्याच मुद्द्यांना राजकीय नेते बगल देत आहेत. त्याऐवजी तात्पुरते मुद्दे मांडत आहेत. एकीकडे खरिपाचे पीक गेले; तर रबीतही अवकाळी पडल्याने हाती आलेले पीक गेले. शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असताना अजूनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. मग, सांगा सरकार ! तुम्ही शेतकऱ्याचे की व्यापाऱ्यांचे असा प्रश्न ? शेतकरी विचारत आहेत.

अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला; तर उन्हाळी मशागती कशा करायच्या हा प्रश्न आमच्यापुढे आहे. तसेच पाऊस झालाच नाही; तर पेरणी कशाच्या जीवावर करायची ? याची चिंता आहे. निवडणूक आणि उमेदवार हे सुद्धा चिंतेत आहेत, अशी परिस्थिती असली तरी शेतकरी वर्गाची चिंता ही सर्वांची चिंता आहे. कारण, पिकलंच नाही; आपण सर्वच खाणार काय ?
- सुरेश राक्षे, शेतकरी, सांगवडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT