"बायका 2-2 नवरे ठेवू लागल्या तरीही...";अरमान आणि त्याच्या दोन पत्नींच्या बिग बॉसमधील एन्ट्रीवर भडकली देवोलीना
Bigg Boss OTT 3 sakal
Premier

Bigg Boss OTT 3: "बायका 2-2 नवरे ठेवू लागल्या तरीही..."; अरमान आणि त्याच्या दोन पत्नींच्या बिग बॉसमधील एन्ट्रीवर भडकली देवोलीना

priyanka kulkarni

Bigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमाचा तिसरा सीझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रसिद्ध युट्यूबवर अरमान मलिकने (Armaan Malik) त्याच्या दोन पत्नींसह बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. अरमाननं पत्नी कृतिका (Kritika malik) आणि पायलसोबत (Payal Malik) 'बिग बॉस OTT 3' (Bigg Boss OTT 3) मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतल्यानंतर अनेकांनी या कार्यक्रमाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अशातच आता अरमान आणि त्याच्या दोन पत्नींच्या बिग बॉसच्या घरातील एन्ट्रीवर अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीनं प्रतिक्रिया दिली आहे.

देवोलीनानं शेअर केलं ट्वीट

देवोलीनानं देखील बिग बॉस या शोमध्ये सहभाग घेतला होता. आता अरमाननं दोन पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यानंतर देवोलीनानं बिग बॉस शो आणि अरमानला खडे बोल सुनावले आहेत. देवोलीनानं अरमान आणि त्याच्या दोन पत्नीचा बिग बॉस ओटीटी-3 या शोमधील व्हिडीओ शेअर करुन ट्वीटमध्ये (X) लिहिलं, "हे मनोरंजक आहे असे तुम्हाला वाटते का? ही करमणूक नाही, ही घाण आहे. ही गोष्ट हलक्यात घेण्याची चूक करू नका कारण हे एक रील नाही तर ते रिअल आयुष्य आहे. म्हणजे या निर्लज्जपणाला करमणूक कशी म्हणता येईल? हे मला समजत नाहीये मला फक्त ते ऐकून तिरस्कार वाटतो की, अवघ्या 6/7 दिवसात प्रेम झालं, लग्न झालं आणि मग बायकोच्या जवळच्या मैत्रिणीसोबत पण तेच झालं. हे माझ्या कल्पनेपलीकडचे आहे."

"बिग बॉस, कार्यक्रमाला काय झालं आहे? या कार्यक्रमाचे एवढे वाईट दिवस आले आहेत का? की, यांना बहुपत्नीत्व मनोरंजक वाटत आहे? जेव्हा तुम्ही अशा स्पर्धकांना कार्यक्रमामध्ये एन्ट्री देता तेव्हा तुम्ही काय विचार करता? हा शो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण पाहतात. तुम्ही नवीन पिढीला काय शिकवण देत आहात की, तुम्ही २-३-४ लग्न करु शकता आणि आनंदाने एकत्र राहू शकता?", असंही देवोलीनानं ट्वीटमध्ये लिहिलं.

पुढे तिनं ट्वीटमध्ये लिहिलं, "म्हणूनच विशेष विवाह कायदा आणि UCC (युनिफॉर्म सिव्हिल कोड) अनिवार्य असावे. जेणेकरून कायदा सर्वांसाठी समान असेल आणि समाज अशा घाणेरड्या गोष्टींपासून मुक्त होऊ शकेल. पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी, ही कल्पना करा जर समानतेच्या नावाखाली बायका 2-2 नवरे ठेवू लागल्या, तरीही तुमची करमणूक होईल का? या लोकांचे फॉलोवर्स नेमके कोण आहेत हे मला समजत नाही. ते कोणत्या कारणासाठी त्यांचे फॉलो करतात? जर तुम्हाला हा निर्लज्जपणा योग्य वाटला तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. तुम्हाला नवीन पिढीला काय शिकवायचे आहे, की त्यांनी एकापेक्षा जास्त विवाह करावेत? जर 2-3 लग्नं करणं गरजेचं असेल तर करा आणि घरीच राहा. ही घाणेरडी मानसिकता जगात पसरवू नका. समाज म्हणून आपण केवळ विनाशाकडे जात आहोत. खरच लोक वेडे झाले आहेत आणि बिग बॉस कार्यक्रमाला नक्की काय झालं आहे, हे मला माहित नाही."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari 2024: पावसाच्या सरींच्या साथीने अवघा वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत दाखल! दर्शनासाठी लोटला भाविकांचा जनसागर

Devendra Fadnavis: महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय? अजित पवारांच्या मंत्र्याला फडणवीसांचे भाजप प्रवेशाचे निमंत्रण

T20 World Cup 2024: रोहितच्या रोबो वॉकचा असा शिजला होता प्लॅन, ICC च्या Video ने उघडलं रहस्य

Vidhan Sabha Election: महायुतीत कोणाला किती जागा? भाजपच्या बड्या नेत्याने सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला

INDIA: अयोध्या जिंकणारा खासदार ठरणार जायन्ट किलर? लोकसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी 'इंडिया'चा मोठा डाव

SCROLL FOR NEXT