varsha usgaonkar  esakal
Premier

माश्यांच्या जाहिरातीवरून माफी ते सासऱ्यांची प्रॉपर्टी हडपण्याचा आरोप, वर्षा उसगावकर अनेकदा अडकल्यात वादाच्या भोवऱ्यात

Payal Naik

मराठी सिनेसृष्टीच्या ड्रीम गर्ल म्हणवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांनी अनेक चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यांच्या अनोख्या स्टाइलचे लाखो दिवाने होते. आजही त्यांची जादू कमी झालेली नाही. साध्य त्या बिग बॉस मराठीमध्ये दिसत आहेत. त्यांना बिग बॉस मध्ये पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र सरळ साधं आयुष्य जगणाऱ्या वर्षा काही वेळा मोठ्या वादात अडकल्या होत्या हे तुम्हाला ठाऊक आहेत का? त्यांना आणि त्यांच्या पतीला तर सासऱ्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीमधून बेदखल केलं होतं. नेमकं काय घडलं होतं?

मागावी लागलेली कोळी बांधवांची माफी

मध्यंतरी वर्षा यांनी एक जाहिरात केली होती ती ऑनलाईन मासे विकत घेण्याबद्दलची होती. मात्र या जाहिरातींवरून मोठा वाद झाला होता. वर्षा यांनी जाहिरातीत 'बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले' असं म्हटलं. त्यामुळे कोळी बांधव आक्रमक झाले. मच्छिमारांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला. यानंतर वर्षा यांनी व्हिडिओ शेअर करून समस्त कोळी बांधवांची हात जोडून माफी मागितली. तसेच कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता असंही त्या म्हणाल्या.

सासऱ्यांच्या केलेला छळ

वर्षा उसगावकर यांनी रवीशंकर शर्मा अर्थात प्रसिद्ध संगीतकार रवी यांचा मुलगा अजय शर्मा यांच्याशी लग्न केलं. संगीतकार रवी यांनी वर्षा आणि अजय हे दोघं आपला छळ करत असल्याचं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर एकच गदारोळ उठला होता. रवी यांनी वर्षा आणि त्यांच्या मुलाला आपल्या संपत्तीमधून बेदखल केलं होतं आणि त्यांच्या मृत्यूनंतर आपल्याला अग्नी देण्याचा हक्कही त्यांच्याकडून काढून घेतला होता. आपल्या मृत्यूनंतरही त्या दोघांना बोलावण्यात येऊ नये अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेनुसार रवी यांचं २०१२ मध्ये निधन झाल्यानंतर त्याचं पार्थिव त्यांच्या मुलींकडे सोपवण्यात आलं.

सासऱ्यांच्या संपत्तीवरूनही झालेला मोठा वाद

सासऱ्यांच्या मृत्यूनंतर वर्षा यांनी त्यांची मुंबईतील संपत्ती हडपल्याचा आरोप त्यांच्या नणंदांनी केला होता. नणंदांनी वर्षा आणि अजय यांच्या विरोधात थेट कोर्टात केस दाखल केली होती. आपल्या वडिलांच्या घरावर आपला हक्क आहे मात्र वर्षा आणि अजय यांनी तो हडप केला असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर कोर्टाने तो बंगला चौघांमध्ये वाटून दिला होता. हे प्रकरण तेव्ह खूप गाजलं होतं. आता बिग बॉस मराठीच्या घरात त्या या प्रकरणी बोलणार का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel–Hamas war: इस्राईलच्या हल्ल्यात हिज्बुल्लाचा कमांडर सुहैल हुसेन हुसैनी ठार; शस्त्रपुरवठा विस्कळीत होण्याचा धोका

Suryakumar Yadav: 'मला फक्त पेपरवर कॅप्टन व्हायचं नाहीये, तर...' सूर्याचं टी२० नेतृत्वाबाबत मोठं भाष्य

Dhangar Reservation: धनगर आंदोलक वर्षा निवासस्थानी; जोरदार घोषणाबाजी करत दिला निर्वाणीचा इशारा

Bigg Boss 18 : ज्योतिषाने आधीच मृत्यूबद्दल केलं होतं सावध ; सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत बिग बॉसच्या घरात खळबळजनक खुलासा

Haryana Election 2024: "माझ्या सारख्या महान व्यक्तीच्या नावामुळं विनेश फोगाट जिंकली"; ब्रिजभूषणचा अजब दावा

SCROLL FOR NEXT