Pune Traffic sakal
पुणे

Pune Traffic : ‘कंपन्या राज्याबाहेर जाण्यापासून थांबवा’

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे हिंजवडी येथील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील युवकांच्या ५८ हजार नोकऱ्या जाणार आहेत.

जर राज्य सरकारने दहा जूनपर्यंत या कंपन्या पुन्हा महाराष्ट्रात राहण्यासाठी ठोस उपाययोजना केली नाही ,तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना शेख म्हणाले की, राज्यात नवीन रोजगार निर्मिती करण्यास सध्याचे ‘ट्रिपल इंजिन’ सरकार अपयशी ठरले आहे. पुणे, पिंपरी, चिंचवडमधील कंपन्या देखील आता राज्याबाहेर जात आहेत.

राज्यातील रोजगार इतर राज्यात जात असताना आता हिंजवडी येथील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. हे गद्दार सरकार केवळ आमदार फोडण्यात मश्गूल आहे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे रोजगार देखील राज्याबाहेर जात आहेत.

‘‘हे सगळं महाराष्ट्रातून जात असताना, महाराष्ट्राचे महत्त्व कमी होत असताना सरकार बघायची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न येथील युवकांना पडलेला आहे, असे शेख यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT