Ashadhi wari  sakal
पुणे

Ashadhi wari : सौजन्य आणि आर्जवता शिकवणारी वारी

सकाळ वृत्तसेवा

सज्जन कोणाला म्हणावे? असा प्रश्‍न आपल्यासमोर आल्यास त्याचे पहिले उत्तर आहे ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एकरूपता आहे, ऐक्य आहे, त्याला सज्जन म्हणावे. सुभाषितकार या विषयी म्हणतात, ‘यथा चित्तं तथा वाचो यथा वाचस्तथा क्रिया। चित्ते वाचि क्रियायां च साधूनामेकरूपता॥’ याचा भाव असा की, सज्जनांच्या मनात असते तेच वाणीत असते. जसे वाणीत असते तसेच कार्य होत असते. कारण सज्जनांचे मन, वाणी आणि कार्यात एकरूपता, समानता असते. या मन, वाणी आणि क्रिया यांच्या एकरूपतेला मनाचा सरळपणा म्हणतात. संतांच्या मनाच्या सरळपणाचे वर्णन करतान श्री तुकाराम महाराज म्हणतात, मृदू सबाह्य नवनीत। तैसें सज्जनाचें चित्त॥...’ ज्याप्रमाणे लोणी सबाह्य मृदू असते, त्याप्रमाणे सज्जनांचे चित्त सबाह्य मृदू असते. हा मनाचा सरळपणा म्हणजेच आर्जव. हे आर्जव एक महत्त्वाचे मानवी जीवनमूल्य आहे.

व्यवहारात वागताना हा मनाचा सरळपणा हा सद्गुण आहे. असे असले तरी, कधी कधी मनाचा सरळपणा हा त्रासदायक ठरतो. म्हणून व्यवहारात आर्जवतेने म्हणजेच मनाच्या सरळपणाने कधी वागायचे याचा विवेक व्यवहारचतुर माणसाने करणे आवश्यक आहे. व्यवहारात असे असले तरी, परमार्थात भगवत् प्राप्तीच्या मार्गावर साधकाने कायम आर्जवतेने वागणे आवश्यक आहे. ही आर्जवता बेगडी, नाटकी असता कामा नये. ती सहजतेने अंगी बाणली पाहिजे. साधक नाटकी आर्जवतेने वागेल, तर तेही एक कपटच ठरेल. साधक कपटीपणाने वागेल तर त्याच्या अंतःकरणावर परिणाम होऊन त्याची पापाचरणामध्ये प्रवृत्ती होते. याच्या उलट साधक निष्कपटतेने, आर्जवतेने वागल्यास त्याची पापवासना कमी होत जाते. यास्तव आर्जवता साधकाने अंगी बाणवणे हे महत्त्वाचे आहे.

या आर्जवतेविषयी श्री ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात, ‘आतां बाळाच्या हितीं स्तन्य। जैसें नानाभूतीं चैतन्य। तैसें प्राणिमात्रीं सौजन्य। आर्जव तें॥’ मातेचे दूध जसे सर्व मुलांचे सर्वतोपरी हित करणारे असते. चैतन्य अथवा प्राण भिन्न भिन्न प्राण्यांच्या ठिकाणी समान असतो. त्याप्रमाणे प्राणिमात्रांशी वागताना असणारे मनाचे सौजन्य म्हणजे आर्जव होय. या संत सज्जनांच्या आर्जवतेने सकळ प्राणिमात्रांचे हित साधले जाते. साधकाची आर्जवता साधकाचे कल्याण करते, तर संतांची आर्जवता ही समाजोद्धारास कारण होते.

खरा वारकरी हा निष्कपट असतो. त्याची निष्कपटता ही त्याच्या चेहऱ्या‍यावरून, वागण्या बोलण्यातून अभिव्यक्त होत असते. वारीमध्ये चालताना वारकऱ्यांचे वादविवाद सहसा होत नाहीत. त्याचे कारण प्रत्येक जण प्रत्येकाशी सौजन्याने वागत असतो. यामुळे वारीच्या माध्यमातून सौजन्य आणि आर्जवतारूप जीवनमूल्य अंगी बाणण्यास सहकार्य होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT