salunke.jpg 
पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : कोरोना संसर्ग रोखायचा आहे ना, मग 'हे' कराच

सकाळवृत्तसेवा

पुणे : "स्थानिक नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर किंवा त्या भागातील जोखमीचे रूग्ण शोधून त्यांचे स्थलांतर आणि प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी हे पुणे शहरातील "हॉटस्पॉट' भागातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठीचे प्रभावी मार्ग आहेत. भवानी पेठ आणि परिसरातील वाढत्या कोरोना विषाणूंच्या संसर्ग रोखायचा असेल, या तीन पर्यायांवर प्रशासनाने भर दिला पाहिजे,' असे राज्य सरकारचे प्रमुख तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी शनिवारी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे शहरातील कोविड-19 च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत भवानी पेठ, ढोलेपाटील, येरवडा आणि कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरातील रग्ण संख्या ही सर्वाधिक आहे. शहरातील हे भाग हॉटस्पॉट ठरले आहेत. लॉकडाऊन करून ही तेथील रुग्ण संख्येत दिवसागणिक वाढत होत आहे. दाटवस्ती, अरुंद रस्ते, सार्वजनिक शौचालय अशा अनेक कारणांमुळे या भागात कम्युनिटी ट्रान्समिशनमध्ये विषाणू पोचला आहे. तो रोखायचा असेल, या जपानमध्ये जी पद्धत अवलंबण्यात आली. त्या पर्यायांचा येथे विचार केला पाहिजे. 

दरम्यान, त्यामध्ये भवानी पेठ सारख्या परिसरातील सर्व नागरिकांचे एकतर तात्पुरते स्थलांतर केले पाहिजे. ते शक्‍य नसेल, तर किमान तेथे जे जोखमीचे रुग्ण आहेत. म्हणजे अन्य स्वरूपाचे आजार आहेत. ज्येष्ठ नागरीक आहेत, अशा नागरिकांना शोधून त्यांचे तात्पुरते स्थलांतर केले पाहिजे. तसे केल्यास काही प्रमाणात या परिसरातील फिजिकल डिस्टिसिंग पाळणे शक्‍य होणार आहे. याशिवाय या परिसरातील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली गेली पाहिजे. त्यांमध्ये जे बाधित असतील, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले पाहिजे. या तीन पर्यायांवर प्रशासनाने विचार केला पाहिजे. तशा सूचना ही प्रशासनाला केल्या असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले. 
आणखी वाचा - मुंबई-पुण्यात पसरली अफवा; वाचा सविस्तर बातमी
तसेच ज्या परिसरात रुग्णांची संख्या वाढते आहे. त्या परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन शिवाय दुसरा पर्याय नाही. हा पर्याय टाळायचा असेल, तर राज्य सरकारकडून ज्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन तेथील नागरिकांना सुज्ञपणे आणि गाभीर्यांने केले पाहिजे. तोंडावर मास्क, वारंवार हात स्वच्छ धुणे, फिजिकल डिस्टिसिंग पाळणे, व्यसन टाळणे या सारख्या गोष्टींवर भर दिला पाहिजे. तरच या विषाणूवर मात करता येऊ शकते. 

काय करा 
-गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. 
-रस्त्यावर फिरताना मास्क आवश्‍यक वापरा 
-फक्त जेवणाच्या वेळेस नाही, दर दिवसातून वारंवार स्वच्छ साबणाने हात धुवा 
-फिजिकल डिस्टिसिंग पाळण्यावर भर द्या. 
- तंबाखू, दारू या सारख्या व्यसनांपासून दूर राहा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT