Shashi Tharoor  Sakal
पुणे

Shashi Tharoor : परराष्ट्र धोरणात मोदी सरकार अपयशी; शशी थरूर

सकाळ वृत्तसेवा

Pune News : अमेरिका आणि युरोपातील माध्यमांनी मोदी सरकारबद्दल नकारात्मक वार्तांकन केले आहे. आज चीन आपल्या सीमेवरील २६ ठाण्यांवर ठाण मांडून आहे. मालदीवमधून भारताला बाहेर पडावे लागले, पंतप्रधानांच्या कच्चाथीवू बेटा संबंधी वक्तव्यामुळे श्रीलंका नाराज आहे.

नेपाळ आपल्याला डोळे दाखवत आहे. तर अनेक देशांमध्ये जाऊन भारताने हत्या घडविल्यामुळे मोदी सरकार परराष्ट्र धोरणात अपयशी ठरले आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी केला.

कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारानिमित्त आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षा, बेरोजगारी, शिक्षण, माध्यम स्वातंत्र्य, कौशल्य विकास, भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवरून शशी थरूर यांनी मोदी सरकारवर टीका केली. मागील दोन निवडणूका ‘अच्छे दिन’ आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर भाजपने जिंकल्या.

आता मात्र त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नाही. मोदींना आता विकासावरच बोलावे लागेल, असे मत थरूर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘मोदींमुळे देशातील फक्त २० टक्के श्रीमंत सुखी झाले आहेत. मात्र, ८० टक्के भारतीय अजूनही दुःखी आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणे, युवकांना रोजगार देणे, वाढती महागाई आदी विषयांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहेत.

त्यामुळेच दुसऱ्या टप्प्यातील मतदाना नंतर देशाचा कल बदलत असून, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला यश मिळणार आहे.’’ व्यासपीठावर यावेळी अभय छाजेड, आशिष दुआ,उल्हास पवार, गोपाळ तिवारी, प्रगती आहेर, संजय बालगुडे, अक्षय जैन आदी उपस्थित होते. संग्राम खोपडे यांनी थरूर यांच्याशी संवाद साधला.

माध्यमांवर मोदींचा दबाव..

शशी थरूर यांनी माध्यमांवर मोदी सरकारचा दबाव असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘‘उद्योगांकडेच माध्यम संस्थांची असल्याने मोदी सरकार त्यांच्यावर दबाव टाकत आहे. सध्याची माध्यमे सरकारचीच रीघ ओढत असून, भाजपकडून माध्यमांना नियंत्रित करत आहे. आम्ही सरकारमध्ये आल्यावर माध्यमांचे स्वातंत्र्याचा आदर करण्यात येईल.’’

कार्यकर्त्याची उद्विग्नता...

पंतप्रधान मोदींसह भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात अनेक सभा घेत आहे. त्या तुलनेत राहुल गांधींसह कॉंग्रेसच्या नेत्यांच्या सभा कमी दिसतात. पक्षाकडे ‘ग्राउंड इंटेलिजन्स’ कमी पडत असून, कॉंग्रेस म्हणून आपण काय करतोय, असा थेट प्रश्न एका कॉंग्रेस कार्यकर्त्याने थरूर यांना विचारला. काही वेळ सर्वच निरुत्तर झाले होते. मोदींचा प्रभाव कमी झाल्याने त्यांना जास्त सभा घ्याव्या लागतात. कॉंग्रेसच्या नेत्यांची माध्यमे दखल घेत नसल्याचे म्हणत नेत्यांकडून वेळ मारून नेण्यात आली. विशेष म्हणजे या प्रश्नाला उपस्थितांनी टाळ्यांच्या माध्यमातून दाद दिली.

इव्हीएमवरील शंका चूकीची

‘इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांमध्ये फेरफार केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, तसेच पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेणे हे मागे नेणारे पाऊल आहे,’ असे सांगत थरूर यांनी ‘इव्हीएम’वर शंका घेणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना घरचा आहेर दिला. ‘व्हीव्हीपॅट’ मशीनची संख्या वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT