MP Sunetra Pawar esakal
पुणे

'जिंकणं, पराभूत होणं हे निवडणुकीत ठरलेलं समीकरण'! माळेगावात सुनेत्रा पवारांनी मानले भाजप नेत्यांचे आभार

कल्याण पाचांगणे

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जरी आम्ही परस्परविरोधी काम करीत असलो, तरी आता राजकीय दृष्ट्या समीकरण बदली आहेत.

माळेगाव : जिंकणे, पराभूत होणे हे निवडणुकीत ठरलेले समीकरण आहे. परंतु, निवडणुकीनंतर अपयश आले तरी ज्या मतदारांनी, कार्य़कर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची धुरा संभाळली, त्यांना भेटणे आणि त्यांचे आभार मानणे हा संस्काराचा भाग असतो. अशाच पद्धतीचा प्रत्येय आज लोकसभेला पराभूत झालेल्या, परंतु राज्यसभेवर बिनविरोध खासदार झालेल्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या माळेगावातील गाठीभेटीतून दिसून आला.

भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, माळेगावचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, जाधवराव परिवारासह अनेक पदाधिकाऱ्यांची सुनेत्रा पवार यांनी माळेगावात येऊन आभार मानले. पवार यांची ही भूमिका आगामी काळात तालुक्याच्या राजकारणाला पोषक ठरणार असल्याचे मानले जाते.

बारामती (Baramati) तालुक्यात भाजपचे नेते चंद्रराव तावरे (सांगवी), माळेगावचे माजी अध्यक्ष रंजन तावरे आदी भाजपच्या नेते मंडळींनी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या त्यावेळच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची प्रचाराची धुरा संभाळली होती. प्रचार प्रक्रियेत त्यांनी काम केले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी माळेगावात शरद संकूलमध्ये सुनेत्रा पवार यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व आभार मानले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष पी. के. जगताप, माळेगाव कारखान्याचे संचालक अॅड. जी. बी. गावडे, माजी संचालक शशिकांत कोकरे, चिंतामणी नवले, राजेंद्र देवकाते, शशिकांत तावरे, संग्राम काटे, चेतन (बाबा) जगताप, अभिजित कोकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित पदाधिकाऱ्यांमध्ये माळेगाव कारखान्यातील सध्याच्या घडामोडींवर मुख्यत्वे चर्चा झाली. ५ लाख लिटर क्षमतेचा इथेनाॅल प्रकल्प होणे, कामगार भरतीमध्ये सर्वांना न्याय मिळावा आदी प्रमुख मुद्यांचा वरील चर्चेत समावेश असल्याचे सांगण्यात आले. हे प्रश्न सोडविण्यासाठी अजितदादांना लक्ष घालण्याची मी स्वतः विनंती करणार आहे, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.

दरम्यान, ``माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जरी आम्ही परस्परविरोधी काम करीत असलो, तरी आता राजकीय दृष्ट्या समीकरण बदली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना आदी मित्र पक्ष एकत्र आले आहेत. त्यावेळी बारामतीमधील परस्परविरोधी काम करणारे मुख्यतः भाजप व राष्ट्रवादी पक्षातील कार्य़कर्ते, पदाधिकाऱ्यांचा समेट घालण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. त्या बैठकीला खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यावेळीही स्थानिक राजकारण व असणारे प्रश्न सामोपचाराने सोडविले जातील, अशी ग्वाही त्यावेळी संबंधित मंत्रीमहोदयांनी दिली होती. त्या प्रसंगाची आठवण चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी पवार यांना करून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT