Sharad Pawar Sakal
पुणे

Sharad Pawar : राजकारणात महिलांची संख्या वाढायला हवी - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ‘‘कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाल्यानंतर महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाहीत, हे नेहमी सिद्ध झाले आहे. आज विविध क्षेत्रात महिलांची संख्या वाढत असली तरी राजकारणात आणि विशेषतः संसदेत व विधिमंडळात महिलांची संख्या अद्यापही कमी आहे. त्यांच्या संख्येत वाढ व्हायला हवी,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते व यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित यशस्विनी सन्मान सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनु आगा, माजी खासदार वंदना चव्हाण आदी उपस्थित होते.

या वेळी सहा महिलांना ‘यशस्विनी सन्मान’ प्रदान करण्यात आला. कलावती सवंडकर यांना ‘कृषी सन्मान’, मीनाक्षी पाटील यांना ‘साहित्य सन्मान’, राजश्री गागरे यांना ‘उद्योजिका पुरस्कार’, रुक्मिणी नागापुरे यांना ‘सामाजिक सन्मान’, श्रद्धा नलमवार यांना ‘क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ आणि संध्या नरे-पवार यांना ‘पत्रकारिता सन्माना’ने गौरविण्यात आले.

पवार म्हणाले, ‘‘महिला आरक्षणाचा कायदा मंजूर झाल्यामुळे २०२९ पासून तरी संसदेत महिलांची संख्या वाढायला हवी. आम्हा सगळ्या भावंडांना आईने शिकवले, पदवीधर केले. सात मुलांपैकी तीन मुलांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण सन्मान मिळाला. एखाद्या महिलेच्या हातात सगळी जबाबदारी दिल्यावर काय होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण होते’’.

सुळे म्हणाल्या, ‘‘मुलींच्या शिक्षणाचे प्रवेश शुल्क सरकार भरणार, असे धोरण राज्य सरकारने केले होते. पण ते शुल्क जमा झालेले नाही.’’ अनु आगा म्हणाल्या, ‘‘शाळा आणि महाविद्यालयांमधील यशस्वी विद्यार्थ्यांची यादी पाहिली तर त्यात मुलींची संख्या सर्वाधिक असते. मात्र पुढे जाऊन विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या पदांवर फारशा महिला दिसून येत नाहीत. हे का होते, याचा विचार करायला हवा’’.

‘‘सध्या पुण्यात रील्ससाठी काहीही केले जात आहे. कृपया हे प्रकार थांबवा. ते केवळ गंमत म्हणून आहे, पण धोका निर्माण होईल, असे काहीही करू नका,’’ असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. मनाली भिलारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर अंकुश काकडे यांनी आभार मानले.

‘सकाळ प्रकाशना’च्या पुस्तकाचे प्रकाशन

महाराष्ट्र सरकारने महिला धोरणास दिलेल्या मंजुरीस तीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणारे ‘धोरण कुठंवर आलं गं बाई’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘सकाळ प्रकाशना’तर्फे या वेळी करण्यात आले. महिलाविषयक विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या १९ कार्यकर्त्यांनी या पुस्तकात धोरणाचे बारकावे उलगडून दाखवले आहेत.

‘महिलांचे आजचे प्रश्न, आव्हाने आणि भविष्यातील आव्हाने, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे’, असे सांगत ‘सकाळ प्रकाशना’च्या कार्यकारी संपादक दीपाली चौधरी यांनी या वेळी पुस्तकामागील भूमिका विशद केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT