Pune Accident speeding truck Hit Tree Engineering Students at Kharadi Bypass 2 died one seriously injured  
पुणे

Pune Accident : मित्राला पुणे स्टेशनला सोडायला निघालेल्या तिघांना भरधाव ट्रकने चिरडलं! फरफटत नेल्याने दोघांचा मृत्यू

अनिल सावळे, सकाळ वृत्तसेवा

पुणे : भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री खराडी बायपास जकात नाक्याजवळ घडली. कल्याणीनगर भागात नुकत्याच झालेल्या पोर्श मोटार अपघातात दोन आयटी अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेला आठ दिवस उलटले असतानाच पुन्हा अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणांचा बळी गेला आहे.

आदिल मजहर शेख (वय २०, रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर, जि. लातूर) आणि फहाद गोहर गुलाम असकर शेख (वय २०, रा. खडकपुरा, ता. औसा, जि. लातूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघे पुण्यातील वाघोली येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत होते. या अपघातात अफान शौकत शेख (वय २०, रा. उदगीर, जि. लातूर) जखमी झाला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी ट्रकचालक श्यामबाबू रामफल गौतम (वय ३५, रा. हांडेवाडी, हडपसर) याला अटक केली आहे. याबाबत अफान शेखने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा संपल्याने आदिल आणि त्याच्या मित्राला गावी जायचे होते. पुणे स्टेशनला जाण्यासाठी तिघेजण दुचाकीवरून निघाले होते. ते खराडी बायपास चौकातील वाघेश्वर पार्किंगजवळ सिग्नलला थांबले होते. त्यावेळी वाघोलीहून चंदननगरच्या दिशेने भरधाव निघालेल्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. ट्रकने दुचाकीवरील तिघांना सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यात आदिल आणि फहाद हे दोघे गंभीर जखमी झाले. आदिलचा जागीच मृत्यू झाला. फहादला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

तरुणांचा जिवाचा आकांत...

ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्यानंतर तिघेही खाली पडले. त्यावेळी तिघांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला. परंतु निर्दयी ट्रकचालकाने ट्रक थांबविला नाही. चालकाने ट्रक तसाच भरधाव वेगाने चालवून तिघांनाही फरफटत नेले. त्यात ट्रकच्या चाकाखाली चिरडून आदिल आणि फहाद या दोघांचा बळी गेला. तर अफान गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मागील १२ दिवसांत १५ जणांचा बळी

शहरात मागील शनिवारपासून (ता. १८) अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील १२ दिवसांत शहराच्या विविध भागात अपघाताच्या ३७ घटना घडल्या. त्यात १५ जणांचा बळी गेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT