निवडणुकीत राजकीय पक्षांना त्यांचे शहर, प्रदेश, देशासाठी व्हिजन मतदारांसमोर मांडण्याची संधी असते. त्यातून लोकशिक्षणही होत असते. परंतु, आरोप-प्रत्यारोपांमुळे लोकशिक्षणाची ही सुवर्णसंधी बहुतांश राजकीय पक्ष वाया घालवतात, हे आपले दुर्दैव आहे. मतदारांनी राजकीय पक्षांना त्यांची विकासाची भूमिका मांडण्याचा आग्रह केला पाहिजे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी व्यक्त केले.
उत्तर : राजकारणात आरोप-प्रत्यारोप एका मर्यादेपर्यंत असतात. परंतु, त्याच्या पलीकडेही राजकारण असते. राजकारणाचा उद्देश हा लोककल्याण असला पाहिजे. शहराचा विकास कसा करता येईल, यावर सांगोपांग चर्चा व्हायला हवी. ‘गव्हर्नन्स’ बाबत गांभीर्याने बोलले गेले पाहिजे. परंतु, आरोप-प्रत्यारोप हा एक प्रकारचा सापळा आहे.
त्यात नेते अडकतात आणि लोकशिक्षणाच्या मुद्द्यांपासून दूर जातात. दरवर्षी एक कोटी रोजगारक्षम युवक निर्माण होत आहेत. त्यांना रोजगार देण्यासाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम हाती घ्यायला हवेत. परंतु, तसे होताना दिसत नाही. निवडणूक केवळ भावनिक मुद्द्यांवर होऊ लागली आहे.
उत्तर : देशाने गेल्या १० वर्षांत अनेक क्षेत्रांत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे शहरांत सुबत्ता निर्माण झाली आहे. परंतु, वाहतूक, कचरा, पाणी, पर्यावरण याबाबतच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. पुण्यातील निवडणुकीत तिन्ही उमेदवार नगरसेवक आहेत. त्यामुळे त्या पद्धतीचेच मुद्दे त्यांच्या भाषणांत येत आहेत.
खासदार हे देशासाठी कायदे करतात. त्यामुळे शहर केंद्रबिंदू ठेवून मुद्द्यांची मांडणी व्हायला हवी. दुर्दैवाने पुणे शहर प्रगतीच्या एका विशिष्ट वाटेवर अडकले आहे. या शहराला व्हीजन देणाऱ्या नेतृत्वाचा अभाव आहे. जाहीरनाम्यातील मुद्द्यांची अंमलबजावणी व्हायला हवी. राममंदिर, ३७० कलम, सीएए हे मुद्दे आहेत. परंतु, त्यापेक्षा शहर विकासाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
उत्तर : नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मनसेचे नेते राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यासाठी प्रचारातही आम्ही सहभागी झालो आहेत. पुण्यात १० मे रोजी राज ठाकरे यांची जाहीर सभा आहे.
त्यासाठी तयारी जोरात सुरू आहे. तसेच निवडणुकीसाठी मनसेच्या शाखानिहाय बैठका सुरू आहेत. त्यानंतरच्या टप्प्यात विभागनिहाय मेळावे होत आहेत. पुढच्या काळात आम्हाला विधानसभा निवडणूक लढवायची आहे. त्याची तयार या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू आहे. भाजपला ज्या-ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तेथे आम्ही सहभागी होत आहोत.
उत्तर : आपण निवडून देणारा लोकप्रतिनिधी संसदेत जाऊन कायदे करणार आहे. तसेच असलेल्या कायद्याची अंमलबजावणी तो करणार आहे. त्यासाठी तो सक्षम आहे का, याचा विचार केला पाहिजे. गव्हर्नन्सचा विषय केवळ स्थानिक स्तरावर नसतो तर तो देश म्हणूनही महत्त्वाचा आहे. कायदेमंडळात त्यावर चर्चा करण्याची त्याची क्षमता असली पाहिजे. तसेच वाढत्या आणि विस्तारणाऱ्या शहराचा विचार करून तो भूमिका मांडू शकला पाहिजे. हा लोकप्रतिनिधी नागरिकांना उपलब्ध असला पाहिजे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.