Sickness Sakal
पुणे

Environment : वातावरण बदलाने ‘डोकेदुखी’; सकाळी ऊन, दुपारी ढग, तर संध्याकाळी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सकाळी उन्हाचा चटका, दुपारी ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी असे एकाच दिवसातील वातावरणामुळे पुणेकरांची ‘डोकेदुखी’ वाढली आहे. ताप, थंडी आणि डोकेदुखीमुळे पुणेकर ‘अशक्त’ झाले असल्याचे निरीक्षण शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.

रुग्णांना विश्रांती घेण्याचा सल्ला

वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अमित गद्रे म्हणाले, ‘‘मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा वेगवेगळ्या आजारात रोग प्रतिकारक शक्ती कमी करण्याची औषधे घेणाऱ्या रुग्णांना या बदलत्या हवामानाचा फटका सर्वप्रथम बसतो. थंडी वाजून ताप येणे, खोकला आणि डोकेदुखी ही प्रमुख लक्षणे या रुग्णांना दिसतात. साध्या औषधांनी रुग्ण बरा होत असला तरीही त्याला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रतिजैविकांची गरज सध्या तरी रुग्णांना लागत असल्याचे जाणवत नाही.’

बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या

डॉ. अमर डांगे म्हणाले, ‘‘नवजात अर्भक आणि एक वर्षापर्यंतचे बाळ बदलत्या वातावरणात आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. ते प्रथमच अशा वातावरणाचा अनुभव घेत असतात. त्यामुळे त्यांना सर्दी, खोकला, ताप येण्याची शक्यता असते. अशा वेळी पालकांनी घाबरून न जाता योग्यवेळी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.’

काय होतंय?

  • कोरडा खोकला, सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली

  • घरातील एकाला सर्दी-खोकला झाल्यास त्याच्यामुळे इतरांनाही संसर्ग

  • श्वसन संसर्गाच्या रुग्णांत वाढ

असे बदलतेय वातावरण

शहरात गेल्या १५ दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. जूनच्या शेवटी पावसाचा जोर वाढला. दमदार सरी पडल्या. पण, त्यानंतर पावसाने ‘ब्रेक’ घेतला. आकाश अंशतः ढगाळ होऊ लागले. त्यामुळे सकाळपासून दुपारपर्यंत उन्हाचा चटका परत जाणवू लागला. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हे वातावरण अनुभवत असल्याने याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजारांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या रुग्णांनी अंथरूण धरले असल्याचेही विविध वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

हे टाळावे

  • सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाऊ नका

  • उघड्यावरील अन्न पदार्थ

  • खाऊ नका

  • फ्रीजमधील पाणी पिऊ नका

हे करावे

  • उकळून गार केलेले पाणी प्या

  • ताजे आणि गरज अन्न पदार्थ खा

  • घराबाहेर पडताना रेनकोट, जर्किन किंवा छत्री घ्या

पावसाळ्यात बऱ्याच वेळा उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ले जातात. पावसाळ्यात घरमाशांचे प्रमाण वाढलेले असते. या माशा उघड्यावरील अन्नपदार्थांवर बसल्याने ते दूषित होते. असे पदार्थ खाण्यात आल्याने आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. उलट्या, जुलाब, मळमळणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. अशा वेळी रुग्णांना हलका आहार घ्यावा.

- डॉ. मंजूषा कदम, वैद्यकीय तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : आमदार राजेद्र शिंगणे यांची अजित पवारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

बिग बॉस फेम अरमान मलिकचा मोठा अपघात; थोडक्यात बचावला जीव, व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT