कोथरुड : एरंडवणा येथील रजपूत झोपडपट्टीतील घरात पाणी येवू नये म्हणून महापालिकेने पंप लावून पाणी उपसा सुरु केला आहे. त्यामुळे घरातील फरशीतून येणारे पाणी कमी झाले असले तरी चाळीतून वाहणारे पाणी कमी झालेले नाही. दरम्यान पाटील रीजन्सीमध्ये खचलेले चेंबर सापडले आहे. चर खोदून तेथील पाण्याला वाट करुन दिल्याने रजपूत झोपडपट्टीतील घरात येणारे पाणी आता बंद होईल अशी आशा कामगारांनी व्यक्त केली. अनिल राणे म्हणाले की, महानगरपालिकेचे कर्मचारी दिवसभर राबत होते.
परंतु पाण्याला वाट करुन द्यायची तर नवी वाहीनी टाकावी लागणार आहे. नवी वाहीनी मोठी असल्याने त्यासाठी मोठा निधी लागेल. निधी मंजूर केला तरी टेंडर वीना काम करण्याचे धाडस कोण ठेकेदार करणार हा प्रश्नच आहे. यातील तांत्रिक अडचणी दूर करुन नव्याने चेंबर बांधणे व वाहीनी टाकण्याची कामे केली तर वस्तीचा प्रश्न सुटेल. हवामान खात्याने इशारा देवूनही सुदैवाने अतीवृष्टी झाली नाही. जोरात पाउस झाला असता तर येणारे पाणी कसे रोखणार या चिंतेने आम्हाला ग्रासले होते. लवकरात लवकर हा घरात येणा-या पाण्याचा प्रश्न सोडवा, असे विठाबाई निम्हण यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.