raj thackeray will change his mind says Deepak Kesarkar Sakal
पुणे

राज ठाकरे यांना महायुतीत आणु त्यांच्याशी बोलणं होईल तेव्हा त्यांचं मतपरिवर्तन होईल -दिपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा

पुणे:- लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मदत केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी विधानसभेत स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना विचारलं असता ते म्हणाले अजून निवडणुकीला उशीर आहे. प्रत्येक पक्ष हा सर्व जागांची तयारी करत असतो.

आमची महायुती असून मागच्या वेळी राज ठाकरे यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांचे शिंदे साहेब तसेच फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहे. आणि विशेषतः ते आमच्या विचाराचे आहे. म्हणून जेव्हा त्यांच्याशी बोलणे होईल तेव्हा नक्कीच त्यांचा मतपरिवर्तन होईल असं यावेळी केसरकर म्हणाले.

पुण्यात आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे शालेय शिक्षण विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

यावेळी केसरकर यांना आमदार अपात्रेबाबत न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे याबाबत विचारलं असता ते म्हणाले की न्यायालयीन प्रक्रिया ही बराच काळ चालत असते.त्यामुळे हा मेजर निर्णय होणार आहे.एक व्यक्ती लोकशाहीत निर्णय घेऊ शकतो का ?

कोणताही निर्णय घेताना पक्षाची बैठक बोलावली पाहिजे पण असं झालेलं नाही आम्हाला जर यातून सुटायचं असता तर आम्ही सहज दुसऱ्या पक्षात किंवा दुसरा गट तयार केला असता. पण मी हे केलेले नाही आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी आमची ही लढाई आहे.आमदारकी पणाला लावून आम्ही लोकशाहीची ही लढाई लढत आहोत.

आणि यात आम्हाला यश येईल याची शंभर टक्के आम्हाला खात्री आहे. आज जे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार म्हणत आहे त्यांनी आरश्यात पाहावं कारण सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की आमदारांनी निवडून आणलेलं हे सरकार आहे. यांना काम करण्याचा अधिकार आहे. उगाच विरोधक खोटं आणि रेटून बोलत असल्याचं यावेळी केसरकर म्हणाले.

यावेळी केसरकर यांना मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की फार मोठ षडयंत्र फडणवीस यांच्याबाबत केले जात आहे. खरं तर मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेला आहे ते फडणवीस साहेब यांनी स्वतः लक्ष घालून ते आरक्षण टिकवलं होतं. महाविकास आघाडीने ते आरक्षण टिकवलं नाही.

आता आम्ही दिलेला आरक्षण हे देखील टिकणारा आरक्षण आहे. हे जे दहा टक्के आरक्षण मिळालेला आहे त्यामुळे मराठा समाजात समाधानाची बाब आहे. परंतु अशी भूमिका घेतल्याने वातावरण बिघडत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची असल्याचे यावेळी केसरकर म्हणाले.

- दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT