Pune Water Storage  Sakal
पुणे

Pune Dam Water level : पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीपातळीत झपाट्याने वाढ; ‘खडकवासला’त २०.२७ टीएमसी पाणी

सकाळ वृत्तसेवा

Pune News : यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या सुमारे पावणेदोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची घसरलेली पातळी आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठा ४२.४६ टक्के झाला आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गुरुवारी (ता. २५) सकाळी आठपर्यंत २०.२७ टीएमसी (६९.५२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत गेल्या २४ तासांत (बुधवारी सकाळी आठपासून गुरुवारी सकाळी आठपर्यंत) ३.७१ टीएमसी पाणी जमा झाले आहे.

सध्या ‘खडकवासला’ प्रकल्पांतील चारही धरणांमधील मिळून एकूण उपलब्ध पाणीसाठा आता २०.२७ टीएमसी इतका झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गेल्या वर्षीच्या जुलैच्या २५ तारखेला १७.८४ टीएमसी (६१.१९ टक्के) इतका पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये २.४३ टीएमसी (८.३३ टक्के) अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

टाटा समूहाच्या धरणांमध्ये २७.९३ टीएमसी साठा

जिल्ह्यात टाटा समूहाची एकूण सहा धरणे आहेत. या सर्व धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठ्याची क्षमता ४२.७६ टीएमसी आहे. यापैकी आतापर्यंत या धरणांमध्ये एकूण २७.९३ टीएमसी (६५.३१ टक्के) पाणी जमा झाले आहे. टाटा समूहाच्या धरणांमध्ये मुळशी, ठोकळवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा व कुंडली धरणांचा समावेश आहे.

‘वीर’मधून ५५ हजार क्युसेक विसर्ग

वीर (ता. पुरंदर) धरणातून गुरुवारी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नऊ दरवाजे उघडून ५५ हजार ६४४ क्युसेक विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

उजनी आज ‘प्लस’मध्ये

उजनी धरणातील अचल साठा पूर्ण होण्यास आणखी ५.६७ टीएमसी पाणी कमी आहे. गुरुवारी दिवसभर आणि रात्री झालेल्या पावसामुळे शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंत धरणातील अचल साठा पूर्ण होऊन उपयुक्त पाणीसाठा जमा होण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये ८४.२२ टीएमसी पाणी

पुणे जिल्ह्यातील टाटा समूहाच्या सहा धरणांव्यतिरिक्त उर्वरित २६ धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठा ८४.२२ टीएमसी इतका झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा ६.५५ टीएमसीने वाढला आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला पाणीसाठा ७७.६७ टीएमसी इतका होता. जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत.

यापैकी सहा धरणे टाटा समूहाची आहेत. टाटा समूहाची धरणे वगळता उर्वरित २६ धरणे आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. सर्व प्रमुख धरणांसह जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता १९८.३४ टीएमसी इतकी आहे.

जिल्ह्याचा धरणसाठा : गुरुवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)

धरणाचे नाव- एकूण क्षमता- गेल्यावर्षी (२५ जुलै)- आजचा साठा -टक्केवारी

  • वरसगाव -१२.८२- ७.५२- ८.०५ -६२.७४

  • पानशेत -१०.६५ -७.०० -८.१३ -७६.३१

  • खडकवासला -१.९७ -१.७२- १.९७- १००

  • माणिकडोह- १०.१७ -३.२६ -२.४५ -२४.१२

  • डिंभे -१२.४९ -५.६६ -६.२३ - ४९.९०

  • घोड- ५.४७ -०.०० -०.४७ -९.७४

  • चासकमान- ७.५८ -५.४६ -४.७३ -६२.४६

  • भामा आसखेड- ७.६६- ४.५१- ३.५४ -४६.१२

  • पवना -८.५१ -५.५५ -५.७७ -६७.८१

  • मुळशी -१८.४६ -१२.०५ -१४.०६ -६९.७५

  • टेमघर -३.७१ -१.६० -२.१२ -५७.२७

  • नीरा देवघर- ११.७२ -७.७५ -७.०५ -६०.०७

  • भाटघर -२३.५० -१२.७६ -१५.७५ -६७.०४

  • उजनी -११७.२१ -१२.२५ -७.८९ -१४.७२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT