school esakal
पुणे

School Time : शाळांच्या वेळा बदलल्याने पालकांची कसरत

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शहरातील काही शाळांनी सकाळच्या सत्रातील वेळापत्रकात बदल केले आहेत. मात्र, त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि स्कूल बस आणि व्हॅन चालकांचे वेळेचे गणित कोलमडले असून शाळेची वेळ साधण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. तर काही खासगी शाळांनी सरकारी आदेश धुडकावून लावत शाळेची वेळ दरवर्षीप्रमाणे सकाळी नऊ आधीचीच ठेवली आहे.

राज्यपाल रमेश बैस यांनी ५ डिसेंबर २०२३ ला झालेल्या एका कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार शालेय शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास केला.

या अभ्यासात शिक्षणतज्ज्ञ, पालक, व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे अभिप्राय नोंदवून घेण्यात आले. त्यावरून स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी नऊ किंवा नऊनंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्या.

त्यानुसार, राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची वर्ग भरण्याची वेळ सकाळी नऊ वाजण्याआधीची आहे, त्या शाळांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून सकाळी नऊ किंवा नऊनंतर वर्ग भरवावेत, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने ८ फेब्रुवारी २०२४ ला अध्यादेशाद्वारे दिला आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील सरकारी आणि अनुदानित शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. खासगी शाळांनी मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

मनपा शाळांच्या बदलल्या वेळा

पुणे महापालिकेच्या २७२ शाळा आहेत. त्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या १४१ शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजून २० मिनिटांपर्यंत अशा एकाच सत्रात या शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित शाळांसाठी सकाळी सव्वासात ते दुपारी सव्वाबारा आणि दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेपाच अशा दोन सत्रांत शाळा भरविण्यात येत आहे. भौतिक सुविधा, वर्ग खोल्या, उपलब्ध शिक्षक-कर्मचारी यांचा विचार करून शाळांच्या वेळा बदलल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

वेळा बदलल्यामुळे पालकांच्या खिशाला कात्री लागली आहे. स्कूल बस आणि व्हॅनचालकांना वेगवेगळ्या शाळांच्या वेळा साधणे शक्य होत नसल्याने त्यांनी आपल्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. शाळेच्या वेळा बदलण्याचा अट्टहास का आणि कशासाठी केला, हे अद्याप उलगडलेले नाही. नोकरदार, व्यावसायिक असणाऱ्या पालकांची यामुळे कुचंबणा होत आहे.

- दिलीपसिंग विश्वकर्मा, महापॅरेंट्‌स पालक संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT