पुणे

कांदा उत्पादकांना कोट्यवधीचा गंडा

CD

पळसदेव, ता. ६ : इंदापूर तालुक्यातील उजनीलगतच्या बागायत पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला असल्याची बाब समोर आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी शेताच्या बांधावरून कांदा खरेदी केलेला व्यापारी सध्या फरारी झाला आहे. कांद्याच्या बिलापोटी शेतकऱ्यांना दिलेले धनादेश वठले नाहीत. आता मोबाईलवरून व्यापाऱ्याशी संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याची खात्री झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्याचा रस्ता धरला आहे. पळसदेव, लोणी-देवकर, वरकुटे, बळपूडी या गावांसह लगतच्या वाड्यावस्त्यांवरील सुमारे ३५ ते ४० शेतकऱ्यांची अडीच कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाली असल्याचे शेतकरी बोलून दाखवीत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी पावसास सुरवात होण्याअगोदर काढणीस आलेला कांदा काढण्याची उजनी लगतच्या बागायत पट्ट्यात लगबग सुरु होती. वाढलेल्या उष्णतेमुळे कांदा खराब होण्याच्या शक्यतेने शेतकरी कांदा काढणीस प्राधान्य देवू लागले. कांद्याला अपेक्षित बाजारभाव नसल्याने नाराज असलेल्या शेतकऱ्यांना दरम्यानच्या काळात बारडगाव (ता. कर्जत, जि. नगर) येथील राजेंद्र भगवान कदम या व्यापाऱ्याने काढलेला कांदा थेट शेतातून खरेदी करण्याचे सांगून दिलासा दिला. व्यापारी शेतातून कांदा नेत असल्याने आणि मजुरी व वाहतुकीच्या पैशाची बचत होत असल्याने अनेकांनी या व्यापाऱ्याला कांदा विकला. कांद्याच्या प्रतवारीनुसार ६ ते १४ रुपये दराने कांदा खरेदी करून व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना जागेवरच कांद्याच्या बिलाची रक्कम लिहून पंधरा दिवस पुढील तारीख टाकून चेक दिला. सुरवातीचे काही दिवस व्यापारी शेतकऱ्यांच्या संपर्कात होता. मात्र, त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याशी संपर्क होत नसल्याने शेतकऱ्यांनी चेक बँकेत खात्यावर भरले. मात्र खात्यावर भरलेले चेक रिटर्न आले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येत इंदापूर पोलिसांकडे धाव घेतली आहे.
पळसदेव येथील कांदा उत्पादक शेतकरी हनुमंत मोरे म्हणाले, ‘‘ओम साई ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून व्यापारी राजेंद्र भगवान कदम याने अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही आता वीस शेतकऱ्यांनी एकत्रित येत इंदापूर पोलिसांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. मात्र, फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी आहे. या परिसरात सुमारे अडीच कोटींहून अधिक रक्कमेची शेतकऱ्यांची देणी देणे ठेवून व्यापारी फरारी झाला आहे. यामुळे बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेल्या कांद्याने आता व्यापाऱ्याच्या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांना रडण्यास भाग पाडले आहे. आता संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याबाबत तत्काळ कार्यवाही होण्यासाठी खासदार, मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना निवेदन देणार आहोत.’’

शेतकऱ्यांवर मनस्तापाची वेळ
सध्या बाजारात चांगल्या कांद्याला तीस रुपयांहून अधिकचा भाव मिळत असल्याने, कांदा विकण्याची घाई केलेल्या शेतकऱ्यांना जरा थांबलो असतो तर, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कांद्याची चाळ तयार होती, कांदा काढून शेतात पडला होता, फक्त तो चाळीत भरणे बाकी असताना, व्यापाऱ्याच्या भूलथापांना बळी पडून कांदा जागेवर विकला आणि आता पश्चात्तापाची वेळ आल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. केवळ वाढलेल्या उन्हामुळे कांदा खराब होईल, या भितीपोटी कांदा विकण्याची घाई केल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT