पुणे

शेती उद्योगात सर्वाधिक रोजगार देण्याची क्षमता

CD

माळेगाव, ता. ८ : ''''बारामती शेती, शिक्षण आणि संशोधनात भारी ठरत आहे, पण आमचेही चंद्रपूर त्यापेक्षा भारी आहे. त्यामुळे चंद्रपूरसह राज्यात शेतकऱ्यांना समृद्ध बनविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान पहाणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे महाराष्ट्र सरकारचा मंत्री म्हणून आमचे काम आहे. शेती उद्योगात सर्वाधिक रोजगार देण्याची क्षमता आहे. त्या हेतूने अॅग्रीरल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, देशी गायींचे संगोपन आदी शेती पूरक व्यवसाय पाहण्याच्या दृष्टीने बारामती दौरा केला. हे प्रयोग राज्यभर शेतकऱ्यांसाठी राबविल्यास शेती क्षेत्रातील नकारात्मकता दूर होईल,'''' असे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

बारामती-शारादानगर येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्राला भेट देण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आज (ता.८) आले होते. त्या पार्श्वभूमिवर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, सीईओ नीलेश नलावडे आदी उपस्थित होते.
यावेळी मुनगंटीवार म्हणाले, की बारामतीत नुकतेच पार पडलेले ''कृषक प्रदर्शन २०२३'' या बांधावरच्या संशोधनासह आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे महाराष्ट्रभर गाजले. त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना झाल्याचे खुद्द कृषिमंत्री अब्दूल सत्तार यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सांगितले. त्यामुळे संशोधक शेतकऱ्यांच्या यशकथा जाणून घेण्यासाठी मी राजकारणविरहित बारामतीचा दौरा केला.``
मुनगंटीवार पुढे म्हणाले, की पोषण आहारात भरड धान्याचा उपयोग करणे, बियाणांची मदत करणे, जैवविविधता बोर्डाच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे. शेती, शिक्षण आणि संशोधनात अॅग्रीकल्चर डेव्हलमेंट ट्रस्टने मोठे काम केले आहे, त्यानुसार या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी सत्तार यांनी स्वतःहा पुढाकार घेत असल्याचे सांगितले होते. याविषयी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, बारामतीला कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी जी कायद्याची चौकट आहे, ती तपासावी लागेल. ते झाल्यानंतर बारामतीसह जेथे आवश्यक आहे तेथे सरकारच्या वतीने विद्यापीठाला मंजूर मिळेल.``

पंजाब, कर्नाटकने शेतकऱ्यांना वीज मोफत दिली आहे, महाराष्ट्रात हा प्रयोग राबविला जाईल का, असे विचारले असता ते म्हणाले,``कर्नाटकचे माहीत नाही, परंतु मोफत विजेच्या धोरणामुळे पंजाब आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले. महाराष्ट्रात मोफत वीज देण्यापेक्षा सूर्यप्रकाशाचा उपयोग होत असलेल्या सोलर सिस्टिमला प्रोत्साहन दिले जात आहे. तब्बल ५० हजार कोटींची मोठी गुंतवणूक करून सोलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प दरात वीज देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करीत आहे. यापुढे शेतकरीच वीज उत्पादक कसा होईल, याकडेही सरकारने लक्षकेंद्रीत केले आहे.
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री


पायातपाय घालण्याची काँग्रेसची संस्कृती
पत्रकार परिषदेत वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, की अधिवेशनाचा कालावधी वाढविणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच महत्त्व सुरळीत कामकाजाला आणि लोकहिताच्या मुद्दांना दिले पाहिजे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा ही केलेली मागणी चुकीची नाही. परंतु विरोधक म्हणून त्यांनी या अधिवेशनाचा उपयोग राजकारणासाठी नव्हे तर लोकहिताच्या चर्चेसाठी करावा. काँग्रेसमध्ये पायातपाय घालून राजकारण करण्याची संस्कृती आहे, त्यामुळेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राजिमाना देण्याचा निर्णय घेतला, असे वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT