पुणे

बाबुर्डीत विजेचे खांब, झाडे जमीनदोस्त

CD

सुपे, ता. १२ : बाबुर्डी (ता.बारामती) गावाला गारांसह झालेल्या वळवाच्या पावसाचा तसेच वादळी वाऱ्याचा शनिवारी (ता.११) सायंकाळी जोरदार तडाखा बसला. घरे, गोठे, वीजेचे खांब व अनेक झाडे पडली. घरे पडल्याने येथील दोन-तीन कुटुंबाला शेजारच्या घरांचा आसरा घ्यावा लागला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही.

वाऱ्याचा वेग एवढा होता की, उडालेले पत्रे ५० ते १०० फुटांवर जाऊन पडले आहेत. एका घरावरील पत्रा तर सुमारे ३०-३५ फूट उंच उडून एका लिंबाच्या झाडावरून पुढे विजेच्या तारांवरून एका बंगल्यावर जाऊन पडले. बांधकाम सुरू असलेल्या या बंगल्याचेही थोडे नुकसान झाले. अनेक गोठ्यांवरील पत्रे उडाले. अनेक ठिकाणी मोठी झाडे पडली. महसुल विभागाने तातडीने पंचनामे केले आहेत.

बाबुडी परिसरातील विजेचे सुमारे १२ ते १५ खांब पडल्याची माहिती सरपंच दत्तात्रेय ढोपरे, माजी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी दिली. या वेळी गोविंद बाचकर, समाधान देशमुख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, तलाठी सुरेश जगताप यांनी नुकसानीचे पंचनामे केल्याची माहिती दिली.


ढोपरे वस्तीवरील अशोक मारुती ढोपरे यांच्या दोन खोल्यांवर पत्रे उडाल्याने घरासह धान्य, कपडे, घरातील सामानाचे नुकसान झाले. या कुटुंबात उभयता दोघे, मुलगी व त्यांची लहान दोन मुले असे पाच जण होते. त्यांनी रात्रीपासून शेजारच्या घरात आसरा घेतला आहे. याच वस्तीवरील उषा बाळू नाळे यांच्या घरकुलावरील पत्रा उडून मोठे नुकसान झाले. येथील शांताराम लक्ष्मण ढोपरे यांच्या गोठ्याचे वाऱ्यामुळे खांब वाकून नुकसान झाले आहे. जगन्नाथ धोंडाबा पोमणे यांचे घर व गोठ्याचे नुकसान झाले आहे.

खोरे मळ्यातील दत्तात्रेय बाजीराव खोरे यांच्या गोठ्यावरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. तर गावठानातील मंदा आनंद लोंढे व अनिल दत्तात्रेय पोमणे यांच्या गोठ्याचे नुकसान झाले. धुळा सोमा महानवर यांच्या दोन खोल्यांवरील पत्रे उडून चारीत पडले. तर एका खोलीवरील व ओसरीवरील पत्रा उचकटला आहे. दिलीप दगडू पोमणे यांनी गुरांसाठी गोठा व शेजारी एक खोली आणि वाड्यासारख्या भिंती बांधल्या होत्या. जोरदार वाऱ्यामुळे गोठा, घर व भिंती ढासळून मोठे नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शेरेच्यावाडीतील प्राथमिक शाळेजवळील सचिन लडकत यांच्या शेडनेटचे खांब पडल्यामुळे सुमारे अर्ध्या एकरातील शेडनेटचे नुकसान झाल्याची माहिती लडकत यांनी दिली.

आजींच्या डोळ्यात आले पाणी
गायकवाड मळ्यातील दादा माणिक गायकवाड यांच्या तीन खोल्यांवरील पत्रे उडून ५० फुटांवरील एका गंजीला व शौचालयाला धडकून पडले. पत्रा उडाला त्यावेळी आजी, सून व नऊ महिन्यांची मुलगी घरात होती. आवाजामुळे येथील दोघी मायलेकी दरवाजाजवळ आल्या होत्या तेवढ्यात भिंतीच्या वीटा पलंगावर पडून पलंग मोडला. सर्वजण घाबरले होते. तातडीने शेजारच्या खोलीत आसरा घेतला. ही माहिती देताना आजींच्या डोळ्यात पाणी आले होते. येथील संतोष पंढरीनाथ गायकवाड यांची वैरणीची गंज उडाल्याने चाऱ्याचे नुकसान झाले.

पाऊस, जोरदार वारा व गारांमुळे बाबुर्डीत घरे, गोठ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बीले तयार करून लागलीच नुकसान भरपाई संबंधितांना दिली जाणार आहे.
- गणेश शिंदे, तहसीलदार

01763

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT