पुणे

गावात भूजल वाढवा, ५० लाखांचे बक्षीस मिळवा

CD

पुणे, ता. २२ ः लोकसहभागातून गावातील घटलेली भूजल पातळी वाढविण्यासाठी दोन वर्ष भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा जाहीर केली आहे. ही स्पर्धा केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेत समाविष्ट गावांपुरती मर्यादित आहे. यात राज्यातील १३ जिल्ह्यांमधील एक हजार ४४२ गावांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेत जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रत्येकी पहिल्या तीन गावांना पुरस्कार दिले जातील. जिल्ह्यात प्रथम आलेल्या गावांना प्रत्येकी ५० लाखांचे तर, राज्यात अव्वल ठरलेल्या गावास एक कोटी रुपयांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे. यात सहभागासाठी गावांनी मंगळवारपर्यंत (ता. २५) प्रस्ताव पाठविणे आवश्‍यक आहे.

केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेत पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा व सोलापूर या चार जिल्ह्यांसह नाशिक, नगर व जळगाव, नागपूर, अमरावती, बुलडाणा, जालना, लातूर आणि उस्मानाबाद या १३ जिल्ह्यांचा समावेश असल्याचे राज्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी सांगितले. अटल भूजल योजनेत पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर या तीन तालुक्यांमधील १०५ ग्रामपंचायतींमधील ११८ गावांचा समावेश असल्याचे पुणे जिल्ह्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गावडे यांनी सांगितले.
जमिनीतील पाण्याचा बेसुमार उपसा झाल्यामुळे देशातील हजारो गावांमधील भूजल पातळी कमी झाली आहे. विंधनविहिरींची खोदाई हे यामागचे प्रमुख कारण आहे. अशा गावांमधील भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने २०२० पासून अटल भूजल योजना सुरु केली आहे. ही पुरस्कार योजना २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोनच आर्थिक वर्षांपुरती मर्यादित आहे. या योजनेत जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावांना प्रत्येकी ५० लाख, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या गावांना ३० लाख आणि तृतीय क्रमांकास २० लाख रुपयांचे आणि राज्यात अव्वल ठरणाऱ्या गावास एक कोटी, द्वितीय क्रमांकास ५० लाख आणि तृतीय क्रमांकाच्या गावास ३० लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय या सर्व गावांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

दोन वर्षात ८४ गावांना पुरस्कार देणार
या स्पर्धेतून प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यातून गुणानुक्रमे पहिले तीन असे राज्यातील १३ जिल्ह्यांमधून ३९ पुरस्कार आणि राज्यस्तरीय तीन असे एका वर्षात ४२ गावांना पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या वर्षीही तेवढीच गावे पुरस्कारासाठी निवडणार आहेत. यानुसार दोन वर्षांत राज्यातील ८४ गावांचा भूजल समृद्ध ग्राम पुरस्काराने गौरव करणार असल्याचे चिंतामणी जोशी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT