पुणे

चर्चासत्र

CD

नदीप्रदुषणास महापालिका जबाबदार
खडकवासला प्रकल्पाचे अभियंता पाटील यांची टीका
पुणे, ता. १८ ः पुण्यातील नद्यांमध्ये मैलापाणी, सांडपाणी, प्रदूषित पाणी सोडण्यास जलसंपदा विभाग नव्हे तर महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदार आहेत. पुणे महापालिकेच्या मैलाप्रक्रिया प्रकल्पाद्वारे केवळ ४०० एमलडी इतकेच पाणी शुद्ध केले जात असून ते अतिशय अपुरे आहे, अशी परखड टीका खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केली.
सामाजिक कार्यकर्ते रूपेश केसेकर यांनी पुणे नदी पुनरुज्जीवन संस्थेच्या सहकार्याने मुळा-मुठा नदी सुधार व नदी प्रदूषण या विषयावर येरवडा येथील बंडगार्डन गणेश विसर्जन घाटावर चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी "जिवीत नदी'' संस्थेचे मनीष घोरपडे, सारंग यादवाडकर, अर्थतज्ज्ञ अमित सिंग, सोलापूरचे रहिवासी अनिल पाटील, वसंत मोरे, नीलेश वांजळे, पुर्णिमा आगरकर, संदीप सोनिग्रा, सचिन धनकुडे, संतोष ललवाणी यांच्यासह पीएमआरडीए (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) व अन्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिका व प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या प्रतिनिधींनी चर्चासत्राकडे पाठ फिरविली.
पाटील म्हणाले, पुण्यातील नदीपात्रातून वाहणाऱ्या पाण्यामध्ये पुणे महापालिकेच्या मैलाप्रक्रिया प्रकल्पातूनच मैलापाणी व सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीपात्रात प्रदूषित पाणी येते. धरणातील पाणीसाठा २९.१५ टिएमसी इतका आहे, त्यापैकी सिंचनासाठी १६ टिएमसी इतका वापर होणे आवश्‍यक आहे, प्रत्यक्षात १० टिएमसीच इतकाच वापर होतो. उर्वरित पाणी महापालिकेला दिले जाते. शहराच्या अनिर्बंध वाढीमुळे पाण्याचा वापरही वाढला आहे. नदीच्या पुररेषेसंदर्भात निळ्या व लाल रेषेची आखणी करणे हे महापालिकेचे काम असून त्याचे पालन झालेच पाहिजे. नदीसंदर्भातील आवश्‍यक नियमांचे पालन करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. ''''
अमित सिंग म्हणाले, ""शहरातील ७८ टक्के लोकांना आपल्या घरातील सांडपाण्याचे नेमके काय होते याची जाणीव नाही. सरकारी पातळीवरील नियोजन निकृष्ट असल्यामुळे हा प्रश्‍न सुटत नाही.''''
यावेळी सांडपाणी शुद्ध करूनच नदीत सोडावे, झाडे, टेकड्या व नद्यांची तोडफोड होऊ नये, नागरीकांना माहिती उपलब्ध करून दिल्यास त्यांच्याकडून नियोजनात मदत होईल, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
---
सोलापूरसह इतर जिल्ह्यांना झळ
सोलापूरचे रहिवासी अनिल पाटील म्हणाले, ""मुळा मुठा नद्यांमध्ये प्रदूषित पाणी सोडले जात असल्याचा परिणाम सोलापुर व अन्य जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनावर होत आहे. तेथील नागरीकांना अनेक असाध्य आजारांना सामोरे जावे लागत असून त्यास जबाबदार कोण आहे, याचा विचार केला पाहिजे.''''
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT