इंदापूर - उजनी धरणातून सोलापूरसाठी पिण्याचे पाणी शुक्रवार (ता. १०) पासून सोडले होते. ते गुरुवारी (ता. २३) बंद केले. तब्बल १३ दिवस सहा हजार क्युसेक वेगाने पाणी सोडल्याने एकूण पाणीसाठ्यात ७.५ टीएमसीहून अधिक घट झाली.
कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार उजनी धरणामधून शुक्रवारपासून सहा हजार क्यूसेकने सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगरपरिषद यांच्यासह इतर गावांना पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर निर्धारित भागात पाणी पोहचून योग्य तो साठा झाल्यानंतर गुरुवारी (ता.२३) सकाळी पाणी बंद करण्यात आले.
उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता लक्षात घेता व होणारे बाष्पीभवनामुळे पाणी पातळी अधिक वेगाने कमी झाली आहे. यामुळे ज्या भागात वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे, तो भाग वगळता उजनी धरण पट्ट्या लागत असलेला इंदापूर, दौंड, करमाळा, श्रीगोंदा, कर्जत या भागातील बळिराजा चिंतातूर झाला आहे.
उजनी धरण - १० मे
(पाणी सोडणे सुरू झाले) :
एकूण पाणीसाठा : ३९. ७२ टीएमसी
जिवंत पाणीसाठा : (-२३.९४ टीएमसी)
पाण्याची टक्केवारी : - ४४.६९ टक्के (उणे ४४.६९ टक्के)
उजनी धरण - २३ मे स्थिती
एकूण पाणीसाठा : ३२.१६ टीएमसी
जिवंत पाणीसाठा : (- ३१.५० टीएमसी)
पाण्याची टक्केवारी : - ५८.७९ टक्के (उणे ५८.७९ टक्के)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.