Union Minister Murlidhar Mohol Esakal
पुणे

Murlidhar Mohol: 72 वर्षे, 18 निवडणुका अन् 13 खासदार; आतापर्यंत पुण्यातील किती जणांना मिळाली केंद्रीय मंत्रीपदाची संधी?

आशुतोष मसगौंडे

लोकसभेतील नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ हे गेल्या ७२ वर्षांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होणारे पाचवे पुणेकर ठरले आहेत. मोहोळ यांच्या रूपाने २८ वर्षांनंतर पुणेकराची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. तसेच, निवडून आल्यानंतर थेट मंत्रिमंडळात प्रवेश मिळालेले पुण्यातील दुसरे खासदार ठरले असल्याची माहिती पुढे आली आहे.

देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ मध्ये झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत नरहर विष्णू गाडगीळ (काकासाहेब) काँग्रेसकडून निवडून आले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले होते. त्यावेळी त्यांच्याकडे वीज, सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे अशी खाती होती. काकासाहेब गाडगीळ यांच्यानंतर पुणेकरांनी आतापर्यंत १२ जणांना खासदार म्हणून दिल्लीत पाठविले आहे. त्यापैकी एकानेही निवडून आल्यानंतर लगेचच मंत्रिपदाची शपथ घेतली नव्हती. तो बहुमान काकासाहेब गाडगीळ यांच्यानंतर मोहोळ यांना मिळाला आहे.

काकासाहेब गाडगीळ यांच्यानंतर १७ वर्षांनी पुण्यातील मोहन धारिया यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांच्याकडे सुरुवातीला (१९७१ ते १९७७) गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याचे राज्यमंत्री पद होते. त्यानंतर १९७७ ते १९७९ या काळात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारमध्ये धारिया यांनी वाणिज्य, नागरी पुरवठा, सहकार ही खाती सांभाळली. धारिया यांच्यानंतर विठ्ठलराव गाडगीळ यांनी सलग तीन वेळा पुण्याचे नेतृत्व संसदेत केले. त्यामध्ये १९८० ते १९८४ या काळात इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे माहिती व प्रसारण मंत्रालय होते.

गाडगीळ यांच्यानंतर अण्णा जोशी यांना १९९१ मध्ये पुणेकरांनी संसदेत पाठविले. मात्र, त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर १२ वर्षांनी पुण्यातून लोकसभेवर निवडणूक गेलेले सुरेश कलमाडी यांना १९९५ मध्ये रेल्वे राज्यमंत्रिपद मिळाले. त्यावेळी पी. व्ही. नरसिंगराव हे पंतप्रधान होते.

कलमाडी यांच्यानंतर विठ्ठलराव तुपे, प्रदीप रावत, दोन वेळा सुरेश कलमाडी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये खासदार अनिल शिरोळे आणि दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले. पण, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश नव्हता. त्यामुळे कलमाडी यांच्यानंतर २८ वर्षांनी पुण्याच्या खासदाराचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.

पहिल्या लोकसभेपासून आत्ताच्या अठराव्या लोकसभेपर्यंत पुण्याने १३ खासदार दिले आहेत. त्यापैकी फक्त पाच जणांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यात मोहोळ यांची वर्णी लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT