Employment In India Citigroup Sakal
Personal Finance

Employment: भारत पुरेशा नोकऱ्या देऊ शकत नाही...सिटी ग्रुपच्या अहवालावर सरकारनं दिलं उत्तर, काय म्हटलंय जाणून घ्या

Employment In India: सोमवारी आकडेवारी जाहीर करताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सांगितले की 2022-23 मध्ये 27 क्षेत्रातील रोजगार 3.31 टक्क्यांनी वाढला आहे. आरबीआयने आकडेवारी जाहीर करण्यापूर्वी सिटी बँकेचा अहवाल गेल्या आठवड्यात आला होता.

राहुल शेळके

Employment In India: सोमवारी आकडेवारी जाहीर करताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सांगितले की 2022-23 मध्ये 27 क्षेत्रातील रोजगार 3.31 टक्क्यांनी वाढला आहे. आरबीआयने आकडेवारी जाहीर करण्यापूर्वी सिटी बँकेचा अहवाल गेल्या आठवड्यात आला होता. यामध्ये भारतातील रोजगार निर्मितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.

सरकारने या अहवालावर तीव्र आक्षेप व्यक्त केला होता आणि म्हटले होते की सिटीग्रुपने पीएलएफएस (पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे) आणि आरबीआय केएलईएमएस डेटाची दखल घेतली नाही.

सिटी बँकेने नोकऱ्यांची संख्या आणि दर्जा यावर प्रश्न उपस्थित केले होते

सिटी बँकेच्या अहवालात असे म्हटले होते की सुमारे 7 टक्के वाढीसह भारतात दरवर्षी केवळ 80 ते 90 लाख नोकऱ्या निर्माण होतील. भारताला 1.1 ते 1.2 कोटी नोकऱ्यांची गरज आहे. वेगवान वाढ असूनही, भारत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकणार नाही. रोजगाराच्या दर्जाबाबतही अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली होती.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सोमवारी, 8 जुलै रोजी या अहवालातील त्रुटींवर प्रकाश टाकला होता. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, कृषी, व्यापार आणि वित्तीय सेवांसह 27 क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या 2022-23 मध्ये वार्षिक आधारावर 3.31 टक्क्यांनी वाढून 59.66 कोटी झाली आहे. या 27 क्षेत्रातील रोजगाराचा आकडा 57.75 कोटी होता.

गेल्या आर्थिक वर्षात 4.67 कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या

मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात देशात 4.67 कोटी नोकऱ्यांची भर पडल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. RBI डेटा दर्शविते की 2023-24 मध्ये रोजगार वाढीचा दर 6 टक्के होता. 2022-23 मध्ये हा आकडा 3.2 टक्के होता. आरबीआयने त्यांच्या वेबसाइटवर KLEMS डेटा उपलब्ध करून दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसह या सर्व 27 क्षेत्रांचा डेटा या डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

देशात दरवर्षी सरासरी 2 कोटी नोकऱ्या निर्माण होत आहेत

आरबीआयने सांगितले की, शेती, वनीकरण आणि मासेमारीमुळे 25.3 कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे. हे 2021-22 मधील 24.82 कोटीपेक्षा जास्त आहे. याशिवाय बांधकाम, व्यापार, वाहतूक आणि साठवणूक क्षेत्रांनीही मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

PLFS आणि RBI च्या KLEMS डेटानुसार, भारताने 2017-18 ते 2021-22 पर्यंत 8 कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. दरवर्षी सरासरी हा आकडा 2 कोटी नोकऱ्यांवर पोहोचतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT