One Nation One Gold Rate Sakal
Personal Finance

One Nation One Rate: सोने होणार स्वस्त! देशभरात असणार एकच भाव, काय आहे 'वन नेशन वन गोल्ड रेट' धोरण?

राहुल शेळके

One Nation One Gold Rate: सध्या देशभरात सोन्याचे भाव वेगवेगळे आहेत. राज्य सरकारच्या कराशिवाय इतरही अनेक गोष्टी यात गुंतलेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक राज्यात आणि शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. मात्र, लवकरच संपूर्ण देशात वन नेशन वन रेट धोरण लागू होणार असून, त्यानंतर सोन्याचा भाव सर्वत्र सारखाच असेल. देशभरातील सर्व बड्या ज्वेलर्सनी याला सहमती दर्शवली आहे.

जेम अँड ज्वेलरी कौन्सिलनेही दिला पाठिंबा

सोन्याच्या समान किमतीसाठी आणल्या जाणाऱ्या वन नेशन वन रेट धोरणाला जेम अँड ज्वेलरी कौन्सिलनेही (जीजेसी) पाठिंबा दिला आहे. देशभरात सोन्याच्या किमती एकसमान असणे हा त्याचा उद्देश आहे. सप्टेंबर 2024 मध्ये होणाऱ्या बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. मात्र, या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ज्वेलरी उद्योग नवीन योजना आखत आहे.

वन नेशन वन गोल्ड रेट पॉलिसी म्हणजे काय?

केंद्र सरकारने प्रस्तावित केलेली ही योजना आहे, ज्याचा उद्देश देशभरात सोन्याच्या किमती एकसमान असणे हा आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात सोने खरेदी केले, मग ते पुणे असो किंवा जळगाव, त्याची किंमत सारखीच असेल.

या धोरणांतर्गत, सरकार नॅशनल बुलियन एक्स्चेंज तयार करेल, जे सर्वत्र सोन्याच्या समान किमती निश्चित करेल आणि ज्वेलर्स समान किंमतीला सोने विकतील.

सोन्याचे भाव कमी होणार?

वन नेशन वन गोल्ड रेट धोरणाच्या अंमलबजावणीमुळे बाजारपेठेत पारदर्शकता वाढेल. सोन्याच्या किमतीत तफावत असल्याने त्याच्या किमतीही कमी होऊ शकतात. याशिवाय सोने विक्रीसाठी काही वेळा मनमानी दर आकारणाऱ्या ज्वेलर्सवरही अंकुश ठेवण्यात येणार आहे.

वन नेशन वन गोल्ड रेट पॉलिसीचे फायदे काय?

बाजारातील पारदर्शकता: या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे सोन्याच्या किमतीत पारदर्शकता वाढेल. ग्राहकाला कळेल की सोन्याची किंमत देशभरात सारखीच आहे, ज्यामुळे किंमतीतील भेदभाव दूर होईल.

समान वागणूक: सर्व ग्राहकांना समान वागणूक दिली जाईल. यामुळे कोणत्याही प्रकारच्या प्रादेशिक किंमतीतील भेदभावाची शक्यता नाहीशी होईल.

बाजार कार्यक्षमता: एकसमान किंमत सोन्याचा बाजार अधिक वाढेल. ग्राहक आणि ज्वेलर्स यांच्यातील किमतीच्या वाटाघाटी कमी होतील.

किमतीत घट: या धोरणामुळे ग्राहकांना वाजवी दरात सोने मिळू शकणार असून, मनमानी दर आकारण्याची शक्यता नाहीशी होणार आहे.

लेव्हल प्लेइंग फील्ड: हे धोरण देशभरातील सर्व ज्वेलर्ससाठी लेव्हल प्लेइंग फील्ड समान करेल. ज्यामुळे लहान आणि मोठ्या ज्वेलर्समध्ये निष्पक्ष स्पर्धा शक्य होईल.

सोन्याचे भाव वाढण्याचे कारण काय?

अलीकडच्या काळात सोन्याचे भाव वाढत आहेत. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 75,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर पोहोचला आहे. चांदीचा भावही 94,000 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. सोने आणि चांदीच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे भू-राजकीय अस्थिरता आणि जागतिक आर्थिक संकट. मौल्यवान धातू सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय मानले जात आहेत, त्यामुळे त्यांची मागणी वाढली आहे आणि किंमती वाढल्या आहेत.

लोकांचा कल सोन्याकडे का वाढत आहे?

सोन्याच्या किमती वाढत असतानाही लोक याला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानतात. विशेषतः आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या काळात सोन्याच्या किमती झपाट्याने वाढतात. लोक सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान मानतात जे इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत तुलनेने स्थिर राहते. यासोबतच सोन्याच्या किमतीत झालेली वाढ पाहता गुंतवणूकदार आणि ग्राहक अजूनही सोने खरेदी करत आहेत, जेणेकरून भविष्यात त्याचे मूल्य आणखी वाढू शकेल.

‘वन नेशन वन रेट’ धोरणाची अंमलबजावणी हे भारतीय ज्वेलरी उद्योगासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. यामुळे सोन्याच्या किमतीत एकसमानता येईल, पारदर्शकता वाढेल आणि ग्राहकांना वाजवी दरात सोने मिळू शकेल.

जीजेसी आणि ज्वेलर्सच्या या उपक्रमामुळे भारतीय दागिन्यांची बाजारपेठ तर सुधारेलच, पण हे धोरण सोन्याच्या किमतीला स्थिरता देण्यासाठीही उपयुक्त ठरेल. येत्या काही दिवसांत या धोरणाची अधिकृत घोषणा आणि अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचा प्रभाव पूर्णपणे दिसून येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT