Reliance Industries Employees Sakal
Personal Finance

Mukesh Ambani: मुकेश अंबांनींच्या रिलायन्सने 42,000 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

राहुल शेळके

Reliance Industries Employees: देशात आणि जगात वाढत्या आर्थिक मंदी दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात खर्चात कपात करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या वार्षिक सर्वसाधारण अहवालात कर्मचारी संख्या कमी करण्याबाबत सांगितले आहे.

कंपनीने म्हटले आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 2023 च्या आर्थिक वर्षात एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 3,89,000 होती, जी 2024 मध्ये कमी होऊन 3,47,000 झाली आहे. रिलायन्स ग्रुपने रिलायन्स रिटेल वर्टिकलमध्ये जास्तीत जास्त खर्चात कपात केली आहे.

कंपनीच्या वार्षिक अहवालात माहिती उघड

रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 24 मध्ये त्यांची संख्या सुमारे 11% किंवा 42,000 ने कमी केली RIL च्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, नवीन भरतीची संख्या एक तृतीयांश पेक्षा कमी होऊन 1,70,000 झाली आहे.

रिटेलमध्ये सर्वाधिक कपात

समूहाच्या कर्मचाऱ्यांच्या कपातीचा एक मोठा भाग किरकोळ व्यवसायात होता, ज्याचा वाटा गेल्या आर्थिक वर्षात RIL च्या 2,07,000 कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 60% होता, जो FY23 मध्ये 2,45,000 होता. Jio ने देखील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या FY24 मध्ये 90,000 पर्यंत कमी केली.

25,699 कोटी रुपये अतिरिक्त खर्च

कर्मचाऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांवरील खर्चात 3% वाढ झाली असून तो 25,699 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे कंपनीवर इतक्या रुपयांचा अतिरिक्त भार आहे.

यापूर्वी, जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीने विक्रमी 18,951 कोटी रुपयांची कमाई केली होती. कंपनीच्या निव्वळ नफ्यात तिमाही आधारावर 20 टक्क्यांनी घट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT