NITI Aayog Report Sakal
Personal Finance

NITI Aayog: गेल्या तीन वर्षात भारतातील आर्थिक आणि सामाजिक विषमता वाढली; नीती आयोगाच्या अहवालात नेमकं काय?

राहुल शेळके

NITI Aayog Report: भारतात 2020-21 ते 2023-24 दरम्यान संपत्ती आणि सामाजिक असमानतेत वाढ झाली आहे. NITI आयोगाने जारी केलेल्या शाश्वत विकास लक्ष्य (SDG) अहवालातून ही बाब समोर आली आहे. SDG इंडिया इंडेक्स अहवालात संयुक्त राष्ट्रांनी (UN) निर्धारित केलेल्या 17 SDG स्केलच्या आधारे भारताच्या कामगिरीचा आढावा घेतला.

यानुसार, असमानता कमी करण्याच्या बाबतीत भारताचा एकूण स्कोअर 2018 मधील 71 वरून 2020-21 मध्ये 67 वर घसरला आहे आणि 2023-24 मध्ये तो 65 झाला.

NITI आयोगाच्या शाश्वत विकास निर्देशांक 2023-24 मध्ये उत्तराखंड आणि केरळ ही चांगली कामगिरी करणारी राज्य म्हणून उदयास आली आहेत. बिहारची कामगिरी सर्वात खराब झाली आहे. या निर्देशांकाद्वारे, NITI आयोगाने सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय मापदंडांवर प्रगतीचे मूल्यांकन केले.

दारिद्र्य निर्मूलन, काम, आर्थिक वाढ, हवामान बदल आणि संधी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वपूर्ण प्रगतीसह कामगिरी सुधारली आहे. या पॅरामीटर्सवर, उत्तराखंड आणि केरळ संयुक्तपणे 79 गुणांसह अव्वल कामगिरी करणारी राज्ये म्हणून उदयास आली आहेत. यानंतर तामिळनाडू 78 गुणांसह तर गोवा 77 गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, या निर्देशांकात बिहार 57 गुणांसह तळावर आहे. खराब कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये बिहार खालोखाल झारखंड (62) आणि नागालँड (63) आहेत. केंद्रशासित प्रदेशांमध्ये, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे आणि दिल्लीचा टॉप 5 राज्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

अहवालाचे प्रकाशन करताना, NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले, 'सरकारी हस्तक्षेपांमुळे भारताला शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणून निश्चित केलेल्या 16 उद्दिष्टांमध्ये सुधारणा नोंदविण्यात मदत झाली आहे.'

ते म्हणाले, '2030 पूर्वी यापैकी काही उद्दिष्टे साध्य करण्याची सरकारला आशा आहे.' SDG निर्देशांक दर्शवितो की 16 उद्दिष्टांपैकी, भारताची एकूण कामगिरी केवळ लिंग समानतेच्या लक्ष्यावर 50 गुणांपेक्षा कमी आहे.

अहवालानुसार, एकूण गुणांवर नजर टाकल्यास सर्व राज्यांची कामगिरी सुधारली आहे. 2023-24 मध्ये राज्यांचे स्कोअर 57 ते 79 पर्यंत होते, 2020-21 मध्ये 66 आणि 2018 मध्ये 57 च्या तुलनेत सुधारणा झाली आहे. 2018 आणि 2023-24 मध्ये उत्तर प्रदेश हे सर्वात वेगाने बदलणारे राज्य ठरले आहे.

SDG इंडिया इंडेक्सच्या चौथ्या आवृत्तीमध्ये, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रगतीचे मूल्यांकन 113 निर्देशकांच्या आधारे करण्यात आले आहे.

SDGs मध्ये 17 उद्दिष्टे आणि 169 संबंधित उद्दिष्टे आहेत, जी 2030 पर्यंत साध्य करायची आहेत. अहवालात म्हटले आहे की, 'यापैकी लक्ष्य 13 (हवामान कृती) मध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे आणि त्याचा स्कोअर 54 वरून 67 पर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, ध्येय 1 (गरिबी निर्मूलन) देखील त्याच्या जवळ आहे आणि त्याचा स्कोअर देखील 60 वरून 72 पर्यंत वाढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT