नवी दिल्ली- मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला संपूर्ण अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे. बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आली आहे.
योजनेनुसार, विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी एक वर्षापर्यंत पैसे दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अशाच प्रकारची घोषणा राहुल गांधी यांनी केली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी की राहुल गांधी यांच्यापैकी कोणाची योजना चांगली आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे.
मोदी सरकारच्या घोषणेनुसार, टॉप ५०० कंपन्यांमध्ये १ कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे. इंटर्नशिपच्या एक वर्षाच्या काळात विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन दिले जाणार आहे. पाच वर्षापर्यंत ही योजना राबवली जाणार आहे. माहितीनुसार, इंटर्नशिप प्रोगॅममध्ये सहभागी होणाऱ्या ५०० कंपन्या विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण खर्च उचलतील. कंपनीच्या सीएसआर फंडाअंतर्गत १० टक्के खर्च गृहित धरला जाईल.
इंडिया आघाडीचे सरकार आले तर एक वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना १ लाख म्हणजे महिन्याला ८ हजार पाचशे रुपये दिले जातील असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं होतं. प्रत्येक ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा झालेल्या तरुणांच्या खटाखट, खटाखट पैसे खात्यात जातील. सोशल मीडियावर वेळ घालवणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही काम देऊ असं राहुल गांधी म्हणाले होते.
महालक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या खात्यामध्ये वर्षाचे १ लाख म्हणजे महिन्याला ८,५०० रुपये दिले जातील,असं देखील आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं होतं. देशात रोजगार निर्मिती होत नाहीये. त्यामुळे काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आम्ही गरीब तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करू, असं ते म्हणाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.