Share Market Sakal
Share Market

Share Market: युती-आघाडी सरकार शेअर बाजारासाठी वाईट असतात का? काय सांगते आकडेवारी

राहुल शेळके

Coalition Government Share Market: युती-आघाडी सरकार शेअर बाजारासाठी वाईट असेलच असे नाही, मात्र सरकारने आपल्या कार्यकाळात स्पष्ट कृती आराखडा बनवला पाहिजे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. विश्लेषकांचे मत असे आहे की, जरी सरकार बदलणे किंवा कमकुवत युती-आघाडी सरकार यांचा बाजाराच्या भावनेवर तीव्र परिणाम होणार असला तरी, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, भारतात सरकारपासून स्वतंत्र असलेल्या अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात.

विश्लेषक म्हणतात की, या चांगल्या गोष्टींमध्ये चांगली तरुण लोकसंख्या, सुशिक्षित लोकांचा एक मोठा वर्ग, भारताची प्रचंड देशांतर्गत बाजारपेठ, भूतकाळातील सुधारणांचा एकंदर प्रभाव तसेच पुरवठा साखळीतील बदल आणि डिजिटलायझेशन यासारख्या जागतिक स्तरावर होत असलेल्या बदलांचा समावेश आहे.

याचा अर्थ असा नाही की सरकारी धोरणांमधील बदलांचा कोणताही परिणाम शेअर बाजारावर होणार नाही. (एमयूएफजी या जपानी संशोधन कंपनीच्या विश्लेषकांनी या गोष्टी सांगितल्या.)

Share Market

UBS विश्लेषकांचे म्हणणे आहे की, भाजपच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये सुधारणांची गती जवळपास सारखीच राहण्याची शक्यता आहे, परंतु निर्गुंतवणूक (सरकारी मालमत्तांची विक्री), भूसंपादन कायदा आणि समान नागरी संहिता यासारखे काही कठोर निर्णय घेण्यासाठी विलंब होऊ शकतात किंवा हे निर्णय घेतले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना वित्तीय शिस्तीबाबत थोडा दिलासा मिळू शकतो.

दुसरीकडे, जर INDIA आघाडीचे कमकुवत युती सरकार बनवले, तर आर्थिक धोरणाची भूमिका मुख्यत्वे तशीच राहील, परंतु बाजाराला सरकारी खर्चाची आणि कमी निर्णायक सरकारची चिंता असेल, ज्यामुळे पुरवठ्यावर दबाव येऊ शकतो. तसेच सुधारणा अंमलात आणण्यास विलंब होऊ शकतो.

Share Market

युती-आघाडीचे सरकार म्हणजे काय? (Coalition Government) 

जेव्हा विविध राजकीय पक्ष एकत्र येवून सत्ता स्थापन करण्याचा करार करतात आणि त्यांच्यापैकी एक नेता सरकारचा प्रमुख म्हणून निवडला जातो तेव्हा युती-आघाडीचे सरकार तयार होते. सामान्यत: अशी युती-आघाडीची सरकारे स्थापन केली जातात जेव्हा कोणताही एक पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी पूर्ण बहुमत मिळवू शकत नाही.

भारतातील युती-आघाडी सरकारांचा इतिहास

भारतातील पहिले युती सरकार 1977 मध्ये स्थापन झाले, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. 1980 आणि 1990 च्या दशकात भारतात अनेक सरकारे स्थापन झाली. या दशकांमध्ये व्हीपी सिंग, चंद्रशेखर, इंद्र कुमार गुजराल आणि एचडी देवेगौडा हे वेगवेगळ्या वेळी भारताचे पंतप्रधान होते.

सरकारच्या अंतर्गत शेअर बाजाराची कामगिरी

युती-आघाडी सरकारे शेअर बाजारासाठी वाईटच असतात असे नाही. PMIndia.gov.in च्या आकडेवारीनुसार, व्हीपी सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या कार्यकाळात डिसेंबर 1989 ते ऑक्टोबर 1990 दरम्यान सेन्सेक्स 95.6 टक्क्यांनी वाढला होता.

भारतीय शेअर बाजाराची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या काळात होती. त्यांनी 22 मे 2004 ते 22 मे 2009 दरम्यान संयुक्त पुरोगामी आघाडी-1 (UPA-1) चे नेतृत्व केले. या कालावधीत सेन्सेक्स तब्बल 179.9 टक्क्यांनी वाढला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT