How will stock market be after Lok Sabha elections results PM Modi's response  Sakal
Share Market

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

PM Modi on Stock Market: 4 जून रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात तेजी येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'तुम्ही बघा, ज्या दिवशी निवडणूक निकाल येईल, त्या दिवशी व्यापारी थकलेले असतील.'

राहुल शेळके

PM Modi on Stock Market: 4 जून रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात तेजी येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'तुम्ही बघा, ज्या दिवशी निवडणूक निकाल येईल, त्या दिवशी व्यापारी थकलेले असतील.'

पंतप्रधान म्हणाले, 'आमच्या सरकारने अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त आर्थिक सुधारणा केल्या आहेत आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी आर्थिक धोरणे लागू केली आहेत. आमचे सरकार आले तेव्हा सेन्सेक्स 25,000 अंकांवर होता आणि आज तो 75,000 अंकांवर पोहोचला आहे.

सामान्य माणूस शेअर मार्केटमध्ये जितकी जास्त गुंतवणूक करेल तितका अर्थव्यवस्थेला फायदा होईल. प्रत्येक नागरिकाची जोखीम घेण्याची भूकही वाढली पाहिजे.' ते म्हणाले की, आजकाल सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्सही वाढत आहेत.

अल्फानिटी फिनटेकचे सह-संस्थापक यूआर भट्ट म्हणाले, ‘हे विधान शेअर बाजाराबद्दल नाही. यावरून सत्ताधारी पक्षाचा भक्कम बहुमताने सत्तेत परतण्याचा आत्मविश्वास किती आहे हे स्पष्ट होते. काही धोरणांची अंमलबजावणी किंवा काही क्षेत्रासाठी निधीचे वाटप केल्याशिवाय बाजार कोणतेही राजकीय विधान गांभीर्याने घेत नाहीत.'

गेल्या आठवड्यात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदींनी गेल्या 10 वर्षांत शेअर बाजारातील वाढीचा उल्लेख केला होता. मोदी म्हणाले, 'मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. 10 वर्षांपूर्वी बाजार कुठे होता आणि आता कुठे पोहोचला आहे ते पहा. लाखो छोटे गुंतवणूकदार आज बाजाराशी जोडले गेले आहेत. आपण जगातील चौथ्या क्रमांकाचे शेअर बाजार आहोत आणि जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वासही वाढत आहे.'

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले होते की बाजारातील अलीकडील गोंधळ निवडणुकांमुळे आहे आणि निकालानंतर बाजार पुन्हा तेजीत असेल. अमित शहा म्हणाले होते की, यापूर्वी बाजार झपाट्याने घसरला असून याचे श्रेय या निवडणुकीला देणे योग्य नाही.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील एका कार्यक्रमात सांगितले होते की, त्यांना निवडणुकीच्या निकालांबद्दल विश्वास आहे आणि निकाल जवळ येताच बाजारातील अस्थिरता कमी होईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे एका कार्यक्रमात सांगितले होते की, कर आकारणी आणि धोरणांच्या बाबतीत वित्तीय बाजार स्थिरतेला प्राधान्य देतो आणि निवडणुकीच्या निकालांबद्दल काळजी करण्याची गरज नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT