karheche pani book by acharya atre literature Sakal
सप्तरंग

दुधाची तहान ताकावर!

सकाळ वृत्तसेवा

- सु. ल. खुटवड

गद्य-पद्य साहित्य, विडंबन, नाटक, चित्रपट, पत्रकारिता, शिक्षण, वक्तृत्व, राजकारण अशा विविध क्षेत्रांत आचार्य अत्रे यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. चतुरस्र आणि अष्टपैलू हे शब्द थिटे वाटावेत असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. इतक्या विविध क्षेत्रांतल्या आपल्या मुशाफिरीचा वेध त्यांनी ‘कऱ्हेचे पाणी’ या पाच खंडांमधल्या आत्मचरित्रात घेतला आहे.

सुमारे अडीच हजार पानांमध्ये हे विस्तृत आत्मचरित्र सामावलेलं आहे. मात्र, एवढं मोठं आत्मचरित्र वाचणं हे अनेकांना वेळेअभावी जमत नाही. नेमकी हीच गरज ओळखून ‘आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान’चे विजय कोलते यांनी पुढाकार घेतला आणि त्यातून ‘कऱ्हेचे पाणी (संक्षिप्त)’ हा आटोपशीर ग्रंथ साकारला.

अत्रे यांचं आत्मचरित्र म्हणजे स्वतःभोवती आरती ओवाळणं नसून, महाराष्ट्राचा शे-सव्वाशे वर्षांचा शैक्षणिक-सांस्कृतिक-सामाजिक- आर्थिक-राजकीय घडामोडींचा इतिहास आहे.

शंभर वर्षांपूर्वी शैक्षणिक प्रवाह कसा होता? सांस्कृतिक चळवळीचं स्वरूप कसं होतं? राजकारणाचं वारं कोणत्या दिशेनं वाहत होतं? त्या काळातले साहित्यिक-पत्रकार यांचं समाजाशी नातं कोणत्या प्रकारचं होतं, सामाजिक चाली-रीती कशा होत्या आदी बाबी समजून घेण्यासाठी ‘कऱ्हेचे पाणी’ वाचायला हवं.

मात्र, वर उल्लेखिल्यानुसार, अडीच हजार पानं वाचणं अनेकांना वेळेअभावी शक्य होणार नाही, तसंच काहींना आर्थिकदृष्ट्याही परवडणार नाही. परिणामी, आचार्य अत्रे यांचं अफाट कर्तृत्व समजून घेण्यासाठी ‘कऱ्हेचे पाणी’ (संक्षिप्त) हा पर्याय पुढं आला. हा ग्रंथ वाचताना दुधाची तहान ताकावर का होईना भागवली जाते, एवढं नक्की!

हो संक्षिप्त आत्मचरित्र दोन-तीन बैठकांमध्ये नक्की वाचून होतं; कारण, एकदा का हे पुस्तक हाती धरलं की वाचक त्यात गुंतून पडतो. त्या काळातल्या प्रवाहाबरोबर वाहत जातो आणि मग पुस्तक खाली ठेवावंसं वाटत नाही, एवढी मोहिनी वाचकांवर पडते.

हे पुस्तक वाचल्यानंतर अनेकांना उत्सुकतेपोटी मूळ खंड वाचावेसे वाटू शकतात. तसं झालं तर ते या पुस्तकाचं यश म्हणावं लागेल. हे संक्षिप्त आत्मचरित्र हा त्या पाच खंडांचा ‘ट्रेलर’ आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

मूळ ‘कऱ्हेचे पाणी’मधल्या एका खंडात सरासरी पाचशे पानं आहेत. मात्र, संक्षिप्त आत्मचरित्रात पानांची ती संख्या (प्रत्येक खंडासाठी) सरासरी पस्तीसवर आली आहे. त्यामुळे ज्यांनी मूळ खंड वाचले आहेत त्यांना हा ‘धावता आढावा’ कदाचित आवडणारही नाही; मात्र, जे वाचक पहिल्यांदाच वाचत आहेत त्यांच्यासाठी हे संक्षिप्त आत्मचरित्र ‘तृष्णावर्धक’ ठरावं. त्यातून त्यांनी मूळ पाच खंडांकडं वळावं अशी अपेक्षा.

आचार्य अत्रे यांच्या आत्मचरित्राचा बारकाईनं अभ्यास करून वसंत ताकवले, डॉ. जगदीश शेवते, शांताराम पोमण, सुरेश कोडितकर यांनी ‘संक्षिप्त’चं शिवधनुष्य लीलया पेललं आहे. वाचकांचा हिरमोड होणार नाही, महत्त्वाचा तपशील वगळला जाणार नाही याची दक्षता बाळगत त्यांनी संपादनाची कात्री मोठ्या कुशलतेनं चालवली आहे.

शिवाय, वाचकांची उत्सुकतासुद्धा चाळवली जाईल याचीही पुरेपूर काळजी घेतली आहे. या चौघांच्या परिश्रमांमुळे ‘संक्षिप्त’चा प्रयोग यशस्वी झाला आहे. ‘आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान’चे संस्थापक-अध्यक्ष ॲड. बाबुराव कानडे यांची अत्यंत अभ्यासपूर्ण, दीर्घ प्रस्तावना या पुस्तकाला लाभली असल्यानं नव्या पिढीतल्या वाचकांना आचार्य अत्रे समजून घेणं सोपं जाईल.

पुस्तकाचं नाव : कऱ्हेचे पाणी (संक्षिप्त)

प्रकाशक : विश्‍वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे

संपर्क : ९१६८६८२२००

पृष्ठं : २०७

किंमत : ३०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT