Prithviraj Chavan  Esakal
सातारा

Prithviraj Chavan : फडणवीस अडीचशे पार का म्हणत नाहीत?

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डोळ्यासमोर दारुण पराभव दिसत असल्याने ते २०० पार म्हणत आहेत. एवढा आत्मविश्वास असेल, तर मग २५० किंवा २८० पार का म्हणत नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘लोकसभेला मतदारांनी भाजपची झोप उडवली आहे. महायुतीत लाथाडी सुरू असून, १४ मंत्रिपदे आणि १२ विधानपरिषद जागा रिक्त आहेत. ती भरली जात नाहीत. हे या सरकारचे अपयश आहे.’

महाविकास आघाडी फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत, हा सत्ताधारी आरोप करत आहेत, या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, ‘फेक नेरेटिव्ह हा शब्दप्रयोग ऐकायला बरे वाटत असेल; परंतु आज बेरोजगार युवक फिरत आहेत. कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांनी तुम्हाला पाडले आहे. हा फेक नेरेटिव्ह आहे का? अनेक राज्ये महाराष्ट्राच्या पुढे गेली आहेत.

अजित पवार यांनी विधिमंडळात सांगितले आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न देशात अकराव्या स्थानावर गेले आहे.’ शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी वाढली. शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, हे सर्व प्रश्न फेक नेरेटिव्ह आहेत का? असा सवाल चव्हाण यांनी केला.

मुंबईत जोरदार पाऊस झाल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. प्रशासनाचे लक्ष नाही. सगळेजण राजकारणात गुंतले आहेत. जोरदार पावसाने स्वत: मदत व पुनर्वसनमंत्री रेल्वे रुळावर अडकणे ही शोकांतिका आहे, अशी टीकाही श्री. चव्हाण यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT