Kas Pathar Satara sakal
सातारा

Kas Pathar Satara : कास- घाटाई मार्गाचे मजबुतीकरण रखडले;वन विभागाच्या धोरणाचा फटका

सकाळ वृत्तसेवा

कास : कास पठारावरून येणारा रस्ता धरणात बाधित झाल्याने त्याला पर्यायी मार्गाची निर्मिती अद्यापही झाली नाही. त्यामुळे घाटाईमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र, घाटाई मार्गाचीही अवस्था दयनीय झाली आहे. तुटलेल्या मोऱ्यावरून जीवघेण्या स्थितीत वाहतूक सुरू आहे. तुटलेली मोरी खचून वाहतूक केव्हा बंद पडेल, याचा भरवसा नसून ऐन पावसाळ्यात वाहतुकीचा खेळखंडोबा उडण्याची भीती आहे.

कास, बामणोली, धावली, जुंगटी परिसरातील शेकडो गावांचा संपर्क त्यामुळे तुटणार आहे. ऐन हंगामाच्या काळात पर्यटनावरही मोठा परिणाम होणार आहे, तरीही वनविभागाच्या धोरणामुळे पूर्वापार सुरू असणाऱ्या घाटाई मार्गावरील काही अंतराचे मजबुतीकरण रखडले आहे. त्यामुळे परिसरातील जनतेत रोष निर्माण होऊ लागला आहे. प्रशासनाने वेळीच योग्य तो मार्ग काढून रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अन्यथा भर पावसात जनआक्रोशला सामोरे जावे लागेल. बांधकाम विभाग, वनविभागाच्या कार्यालयावर लोक मोर्चा काढल्याशिवाय गप्प बसणार नसल्याची खदखद कास, बामणोली परिसरातील लोकांतून व्यक्त होत आहे.

कास, बामणोलीकडे जाणारा मुख्य रस्ता कास धरणात बाधित होऊन पाच वर्षे उलटली, तरी अद्याप त्याला पठारावरून पर्यायी रस्त्याची निर्मिती झाली नाही. प्रशासनाच्या या नाकर्तेपणाचा कळसच म्हणावा लागेल. दयनीय अवस्था असलेल्या लांब पल्ल्याचा घाटाई मार्ग प्रवाशांच्या माथी मारला आहे. मात्र, या मार्गावरील मोरी तुटली असून, खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पाण्याची तळी साचून चिखल झाला आहे, तरीही या मार्गाचे मजबुतीकरण होत नसल्याने शेकडो गावातील नागरिकांनी ऐन पावसाळ्यात प्रवास करायचा कोठून प्रशासनाला काही सोयर सुतक आहे, की नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

कास घाटाई मार्गावरील सातशे ते आठशे मीटर अंतराच्या रस्ता मजबुतीकरणाला वनविभागाने खीळ घातल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात दुर्गम भागातील जनता वेठीस धरली जाणार आहे. घाटाई-वांजळवाडी कास हा मार्ग पूर्वीपासून सुरू असून, त्यावरून वाहतूक कायमच सुरू आहे. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे त्याचे मजबुतीकरण रखडले आहे. वनविभागाने रस्त्यात खोडा घातलेली जमिनीचा गट हा अनेक वर्षांपूर्वी संपूर्ण कास गावची मुलखीपड क्षेत्र म्हणून कास ग्रामस्थांच्या ताब्यात होते.

मात्र, मधल्या काळात शासनाने त्या जमिनीच्या गटाला वनक्षेत्रात रूपांतरित केले असले, तरी त्यावेळच्या वन प्रशासनाने रस्त्याची जागा सोडून दोन्ही बाजूला हद्दी करून चिरे उभे करत चरी मारून घेतली आहे. काही ठिकाणी दगडी बांधही घातले आहेत. रस्त्याची जागा मोकळी सोडली आहे. या खुणा आजही अस्तित्वात आहे. या मार्गावरून वर्षानुवर्षे वाहतूक सुरू आहे. मात्र, आताच्या वनाधिकाऱ्यांनी या ठिकाणी रस्ताच नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. मजबुतीकरणाला खीळ घातली आहे. त्यामुळे या रस्त्याचेही भिजत घोंगडे पडले आहे. एकीकडे दळणवळण ठप्प होण्याच्या मार्गावर असताना वर्षानुवर्षे जनतेला वेठीस धरले जात आहे. कागदी घोड्यापुढे सर्वसामान्य जनतेने नाचायचे किती? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून कास रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

..तर टाळे ठोको मोर्चा

कास, बामणोली, जुंगटी भागातील वाहतूक घाटाईमार्गे सुरू आहे. या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात तो केव्हाही बंद पडेल, अशी अवस्था आहे. या मार्गाला मजबुतीकरण करणे गरजेचे असताना वनविभागाच्या धोरणाचा फटका बसत आहे. वेळीच उपाययोजना करून मजबुतीकरण करावे. अन्यथा, नागरिकांनासोबत घेऊन बांधकाम व वन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोको मोर्चा काढणार, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT