Shri Ram Cooperative Sugar Factory Annual Meeting Ramraje Naik Nimbalkar esakal
सातारा

Ramraje Nimbalkar : आमच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न कराल, तर त्याचा पायच निघेल; रामराजेंचा कोणाला इशारा?

श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विरोधकांनी चिंता करू नये.

सकाळ डिजिटल टीम

आपण कितीही धरणे बांधली; पण जर पाऊसच पडला नाही, तर धरणात पाणी येणार कुठून?

फलटण शहर : श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विरोधकांनी चिंता करू नये. हा कारखाना आता अवसायानातून सुस्थितीत आला आहे. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांप्रमाणेच श्रीरामही ऊस दर देऊन शेतकरी समृद्ध करण्याचे काम करेल. विरोधकांना मात्र हे बघवत नसल्याने त्यांनी याही कारखान्यात राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आमच्या पायात पाय घालण्याचा जो प्रयत्न करेल. त्याचा पाय निघेल, असा इशारा आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या (Shri Ram Sugar Factory) ६८ व्या वार्षिक सभेचे आयोजन कारखानास्थळावर करण्यात आले होते. त्या वेळी रामराजे (Ramraje Naik Nimbalkar) बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन भोसले यांच्यासह संचालकांची उपस्थिती होती.

आपण कितीही धरणे बांधली; पण जर पाऊसच पडला नाही, तर धरणात पाणी येणार कुठून? असा सवाल करून रामराजे म्हणाले, ‘‘तालुक्यातील शेतकऱ्यांनी फक्त धरणातील पाणी आपल्याला कसे मिळेल, याचा विचार न करता आज अनियमित पाऊस का पडत आहे, याचा अभ्यास केला पाहिजे. उसाचा गाळप हंगाम तीन महिनेच चालतो. कारण उसाचे उत्पादनच निघत नाही. त्यामुळे कारखान्याचा दर आणि रिकव्हरी याचा विचार करून चालणार नाही.

जागतिक तापमानवाढीमुळे पावसाची अनियमितता आहे. त्यामुळे अशा हवामानामध्ये आपल्याला कमी पाण्यावर येणारा उसाचा वाण तयार केले पाहिजेत, तरच यापुढील काळात आपल्याला उसाचे उत्पादन घेता येईल. ऊस पिकला तरच कारखाना टिकेल व कारखाना टिकला तरच ऊस उत्पादक शेतकरी टिकेल.’’

श्रीराम आज सुस्थितीत असल्याचे विरोधकांना बघवत नाही. अगोदर त्यांनी स्वत:च्या कारखान्यावर किती कर्ज आहे, देणी किती आहेत, रिकव्हरी किती आहे, गाळप क्षमता किती आहे, हे पाहावे. जे श्रीरामला ऊस घालत नाहीत. ते आता या कारखान्यावर बोलत आहेत. श्रीराम कारखान्याने केलेले करार पारदर्शक आहेत. हे करार झाले नसते, तर आज हा श्रीराम चालू स्थितीत दिसला नसता. शेतकऱ्यांनीही आम्ही केलेल्या कामाचे चीज करावे, असे आवाहन रामराजे यांनी सभासदांना केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: मेट्रोचा दरवाजा उघडला अन् बाहेर पडणाऱ्या प्रत्येक पुरुषाला पोलिसांनी चोप-चोप चोपलं, काय घडलं असं नेमकं ?

Gold Seized In Pune: पुण्यात सापडलेलं १३८ कोटींचं सोनं कोणाचं? कुठून कुठे निघाला होता टेम्पो? पोलिसांनी सगळंच सांगून टाकलं

Latest Maharashtra News Updates Live : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या CEC बैठकीसाठी AICC मुख्यालयात दाखल

CID Teaser: ठरलं! CID चा दुसरा सीझन येणार; टीझरमध्ये दिसणाऱ्या कलाकारांना ओळखलंत का?

IPL 2025 Auction: LSG फ्रँचायझी नाही, तर केएल राहुलच रिटेन्शनची ऑफर नाकारणार? नवे अपडेट्स आले समोर

SCROLL FOR NEXT