ratan tata tcs y2k esakal
विज्ञान-तंत्र

Ratan Tata TCS: जागतिक संकटाचं केलं सोनं अन् रतन टाटांची लाडकी टीसीएस नंबर 1 कंपनी बनली! काय होता 'वाय-टू-के' प्रॉब्लेम?

सकाळ वृत्तसेवा

टाटा समूहाचे ज्येष्ठ उद्योगपती आणि पद्मविभूषण रतन टाटा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रतन टाटा यांनी मार्च १९९१ मध्ये टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या कारकिर्दीत टाटा समूहाचा महसूल अनेक पटीने वाढला. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले तेव्‍हा या समूहाची उलाढाल १० कोटी रुपये होती. २०११-१२ मध्ये ही उलाढाल १००.०९ अब्ज डॉलरवर पोहोचली.

टाटा समूहातील त्यांच्या लाडक्या कंपन्यांपैकी एक म्हणजे टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. फक्त भारतातच नाही तर जगभरातील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये टीसीएसचा समावेश होतो. टीसीएसच्या यशाला एका जागतिक संकटाने साथ दिली होती हे तुम्हाला माहीत आहे का ? काय घडलं होतं नेमकं ?

गोष्ट आहे १९९९ सालची. भारतात जागतिकीकरणाने आपले पाय ठामपणे रोवले होते. जगभरातील मोठ्या कंपन्या भारतात येत होत्याच पण भारतीय कंपन्या देखील जगाशी स्पर्धा करू लागल्या होत्या. घराघरात संगणकाचे आगमन होऊ लागले होते. येणारे नवे सहस्त्रक हे संगणकाचे असेल हे आता कळून चुकले होते.

अशातच जगाला एका नव्या समस्येने ग्रासले ते म्हणजे 'वाय-टू-के' संकट

झालं असं होतं की, त्या काळात संगणक तारीख नोंदवताना फक्त वर्षाचे शेवटचे दोन अंक वापरायचा. उदाहरणार्थ, ३१ डिसेंबर १९९९ ही तारीख संगणकात ३१/१२/९९ अशी नोंदवली जात असे. समस्या अशी होती की, १९९९ संपून २००० सुरू होताना, संगणक तारीख ३१/१२/०० अशी नोंदवला असता, आणि संगणकाच्या दृष्टिकोनातून ते वर्ष १९०० समजण्याची शक्यता होती. हे वरवर साधं वाटू शकतं, पण यामुळे संगणकावर आधारित व्यवहारांमध्ये मोठे त्रास होऊ शकले असते. बँकांच्या व्याज गणनेत चुक झाली असती, कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात गोंधळ झाला असता आणि इतर सर्व डेटा गहाळ किंवा चुकीचा झाला असता. त्यामुळे संगणकाच्या तारीख नोंदवण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक होतं, आणि तेही ३१ डिसेंबर १९९९ च्या आत.

हे एक मोठं आव्हान होतं, पण तितकीच मोठी संधीही होती. भारतीय आयटी कंपन्यांनी या संधीचं सोनं केलं, विशेषतः 'टीसीएस'नं. Y2K समस्या सोडवण्यासाठी रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील  टीसीएसला प्रचंड प्रमाणात कंत्राटं मिळाली, ज्यामुळे कंपनीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी उडी घेतली. त्या काळात जगातील १० मोठ्या कंपन्यांपैकी सहा कंपन्या टीसीएसच्या सेवांचा वापर करत होत्या. २००२ पर्यंत टीसीएस खऱ्या अर्थानं जागतिक कंपनी बनली होती, आणि त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे २००० सालात पाऊल ठेवताना निर्माण झालेली Y2K समस्या, ज्यामुळे टीसीएसला मोठं यश मिळालं.

रतन टाटा यांच्या दुरदृष्टीने संकटाला संधीमध्ये रूपांतरित केलं. त्यांच्या धोरणांचा परिणाम म्हणजे आजही टीसीएस ही कंपनी भारतातील नंबर वन सॉफ्टवेअर कंपनी बनली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata : भावुक क्षण! रतन टाटांच्या लाडक्या 'गोवा' ने घेतले अंत्यदर्शन; काय आहे हृदयस्पर्शी कहाणी?

Ratan Tata: इस्रायलपासून ते अमेरिकेपर्यंत... टाटा समूहाचे साम्राज्य विदेशात किती पसरले आहे?

Latest Maharashtra News Updates : रतन टाटांच्या पार्थिवाला पोलिसांकडून मानवंदना

Mokhada News : अर्ध्या तासाच्या वादळी पावसाने मोखाड्यात ऊडवली दाणादाण; सुदैवाने जिवीतहानी टळली..

शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा यांना जुहूमधील घर खाली करण्याची नोटीस; पुण्यातील फार्म हाऊसदेखील केलं सील

SCROLL FOR NEXT