Mobile Care Tips in Monsoon: देशात मान्सून दाखल झाला असून अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळ्यात अनेक लोक फिरायला किंवा ट्रेकिंगला जातात. अशावेळी मोबाईलची कितीही काळजी घेतली तरी तो भिजतो. तसेच अनेकवेळा जोरदार पाऊस असेल तर दुचाकीवर ऑफिसमधून घरी येताना किंवा चालत असलो तरी फोन भिजतो.
सध्या फोन हा आपल्या जीवनातील आवश्यक घटक बनला आहे. पाण्यामुळे फोन खराब होऊ शकतो. फोन दुरूस्तीला दिला तरी खुप खर्च होतो. यामुळे पाण्यात फोन भिजला तर काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया.
पावसात फोन भिजल्यास सर्वात आधी स्विच ऑफ करावा.
त्यानंतर सुती कापड्याच्या मदतीने फोन बाहेरच्या बाजूने कोरडा करावा.
फोनमधील सीम कार्ड आणि मेमरी कार्ड बाहेर काढावे.
पावसात फोन भिजल्यास तो बंद पडतो. अशावेळी फोन बंद पडला म्हणून चार्जिंगला लावू नका.
अनेक लोक फोनमधील पाणी काढण्यासाठी जोरात झटकतात. पण असे करू नका.
फोन ओला झाला म्हणून अनेक लोक उन्हात ठेवतात. पण असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे पोनची बॅटरी खराब होऊ शकते.
अनेक लोक फोनमधील पाणी शोषले जाण्यासाठी तांदळामध्ये ठेवतात.पण असे केल्याने फोनला तांदूळ चिपकून राहू शकतात. त्यामुळे असे करणे टाळावे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.