उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील राजीव शुक्ला (३५) या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला गेले होते. यावेळी त्यांनी एका हॉटेलमधून स्वत:साठी शाकाहारी जेवण ऑर्डर केले. मात्र जेवण करताना शुक्ला यांना मेलेला उंदीर आढळल्याने त्यांना धक्काच बसला. यानंतर ते आजारी पडले. त्यानंतर राजीव शुक्ला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पीडित राजीव शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी शाकाहारी जेवण मागवले होते. परंतु अन्नामध्ये मृत उंदीर आढळून आला आणि प्रकृतीच्या चिंतेमुळे त्यांना 75 तास रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. शुक्ला यांनी आरोप केला की, त्यांना मुंबई पोलिसांकडून फारशी मदत मिळाली नाही. कारण या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.
नेमकं काय घडलं?
६ जानेवारीला प्रयागराजचे रहिवासी राजीव शुक्ला (३५) मुंबईत पोहोचले. येथील एका हॉटेलमध्ये थांबलो आणि ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपद्वारे वरळी आउटलेटवरून शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली. शाकाहारी जेवणाच्या डब्यात भात, भाजी, डाळ, पराठे, गुलाब जामुन आणि कोशिंबीर होती. पीडित राजीव याला डब्यात डाळ खाताना मृत उंदीर आढळला.
तर गुलाब जामुन असलेल्या बॉक्समध्ये मृत झुरळ आढळून आल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे राजीव शुक्ला यांनी सांगितले. अचानक त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी तपासणी केली असता अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. १२ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, नायर रुग्णालयाने नागपाडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. पण काही उपयोग झाला नाही. अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. (Latest Marathi News)
यानंतर पीडित राजीवने वांद्रे येथील अन्न व औषध प्रशासनाकडे धाव घेतली. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली. परंतु, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.