During the campaign meeting at Khandesh Goshala ground, Dr. Amit Shah was presented with Shri Ganesha idol.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : ‘व्होट बँक’च्या भीतीमुळे ‘ते’ हिंदुत्वापासून दूर; अमित शहा यांचा गांधी, ठाकरेंवर हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election : अयोध्येत साकारलेल्या श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. मात्र, ‘व्होट बँक’च्या भीतीमुळे ते उपस्थित नव्हते. आम्हाला मात्र तशी भीती नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून गांधी, ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दीक हल्ला चढविला. तसेच, हिंदुत्वावरून पाच प्रश्‍नांद्वारे ठाकरे यांना खुले आव्हान देत शहा यांनी देशहितासाठी नरेंद्र मोदी यांना सत्ता द्यावी, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन केले.

लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ खानदेश गोशाळेच्या मैदानावर सोमवारी (ता. १३) दुपारी दीडनंतर केंद्रीय गृहमंत्री शहा यांची सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, आमदार अमरीश पटेल, जयकुमार रावल, दिलीप बोरसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जयप्रकाश बाविस्कर, राहुल आहेर, शशिकांत वाघ, भाजपचे निवडणूक समन्वयक राजवर्धन कदमबांडे, गजेंद्र अंपळकर, अनुप अग्रवाल, बबन चौधरी, राम भदाणे, प्रा. अरविंद जाधव आदी उपस्थित होते.

मोदी, गांधींमध्ये तुलना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यांचे नाव घेणे सोडले आहे, त्या वीर सावरकरांना प्रणाम करतो, अशा टीकेतून शहा यांनी भाषण सुरू केले. ते म्हणाले, की एकीकडे १२ लाख कोटींचा घोटाळा करणारे राहुल गांधी यांचे काँग्रेस व मित्रपक्ष, तर २३ वर्षे मुख्यमंत्री, पंतप्रधान राहूनही २५ पैशांचा आरोप नसलेले नरेंद्र मोदी, तापमान वाढताच बँकॉक व थायलंडला सुटीसाठी जाणारे राहुल गांधी आणि चुकून दिवाळीची सुटी घेतलीच तर ती जवानांबरोबर घालविणारे नरेंद्र मोदी, चांदीच्या चमचाने जन्मलेले राहुल गांधी आणि चहा विक्रेत्याच्या घरात जन्मलेले नरेंद्र मोदी यापैकी कुणाची निवड करावी, हे मतदारांनी ठरवावे.

श्रद्धाकेंद्रांचा जीर्णोद्धार

देशात ७० वर्षे काँग्रेसने, नंतर त्यांच्या सरकारमध्ये सहभागी शरद पवार यांनी श्रीराम मंदिराचा प्रश्‍न लटकत व कायदेशीर लढाईत गुंतवून ठेवला. मात्र, दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर मोदी यांनी श्रीराम मंदिरासंबंधी याचिका जिंकली, अयोध्येत भूमिपूजन केले आणि यंदा २२ जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही केली. काशी- विश्‍वनाथ कॉरिडॉर, सोन्यातून घडविले जाणारे सोमनाथ मंदिर असो किंवा देशातील अन्य श्रद्धाकेंद्रे त्यांचा जीर्णोद्धार मोदी करीत असल्याचे शहा म्हणाले.

देशाची सुरक्षा महत्त्वाची

दहशतवाद, नक्षलवाद संपुष्टात आणणारे काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य होता की नव्हता, हे ठाकरे यांनी नैतिकेतून सांगावे. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शरद पवार यांचे सरकार असताना सतत बॉम्बस्फोट व्हायचे. त्यास मुंबई अपवाद नाही. मात्र, मोदी यांनी शत्रूराष्ट्राच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. अशा प्रकारे राहुल गांधी देशाला सुरक्षित ठेवू शकतील का? त्यामुळे देशहितासाठी मोदी सरकार निवडावे, असे आवाहन शहा यांनी केले.(latest marathi news)

ठाकरे यांना आव्हान

सत्तेच्या लोभापायी राजकीय सिद्धांत सोडणारे उद्धव ठाकरे यांनी पाच प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असे खुले आव्हान शहा यांनी दिले. त्यानुसार दहशतवादी कसाबचे समर्थन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांबरोबर राहणार का, मुस्लिम पर्सनल लॉ पुन्हा आणू पाहणाऱ्या काँग्रेसबरोबर आहात का, वीर सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेस व राहुल गांधींच्या भूमिकेशी सहमत आहात का, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आहुती दिली आणि याविरोधी भूमिका असणाऱ्यांशी हातमिळवणी करून सनातन धर्माला विरोध करणार का, कोरोनाच्या संकटकाळात मोफत लस देणाऱ्या मोदी यांच्याप्रमाणे राहुल गांधी देशाला वाचवू शकतील का या प्रश्नांवर ठाकरेंकडून उत्तरे मिळाली पाहिजेत, अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली.

गांधींचे २० वेळा लॉन्चिंग ‘फेल’...

राजकारणात राहुल गांधी यांचे २० वेळा लॉन्चिंग ‘फेल’ झाले. त्यामुळे ते मोदी यांच्याप्रमाणे चांद्रयान पाठवू शकतील का? पाकिस्तानला धडा शिकवू शकतील का? दहशतवाद, नक्षलवाद संपुष्टात आणू शकतील का? गरिबांपर्यंत गॅस, पाणी, वीज, आरोग्य सुविधा, मोफत धान्य पोहोचवू शकतील का? देश समृद्ध करू शकतील का?

मोदींच्या संकल्पाप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणू शकतील का? मोदींप्रमाणे देशाला विकासात पुढे नेऊ शकतील का? त्यांना केवळ परिवाराची चिंता आहे, अशी टीका करीत श्री. शहा यांनी २० मेस अधिकाधिक मतदान करून भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. भामरे यांना विजयी करावे, असे आवाहन मतदारांना केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT