Manibeli village made into an island esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Flood News: नर्मदा काठावरील गावांना पुराचा वेढा! मणिबेली बनले टापू

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Flood News : नर्मदा नदीला आलेल्या पुरामुळे नंदुरबार जिल्ह्यातील बुडीत क्षेत्रात पाणी भरले आहे. त्यामुळे नर्मदा काठावरील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला. मणिबेली गाव टापूसदृश बनले असून, तेथील नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत आहे.

त्यामुळे नदीच्या पाण्याचा वाढता प्रवाह पाहून तेथील गावकरी संकटात सापडले आहेत. दुसरीकडे पाण्यात साप, मगर यांचा वावर वाढला असल्याने नागरिकांना अधिक सतर्कता बाळगावी लागत आहे. (Nandurbar Flood News Villages on banks of Narmada surrounded by floods Manibeli became an island)

सातपुड्यात सुरू असलेली संततधार व नर्मदा नदीच्या उगम क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे नर्मदा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यात महाकाय सरदार सरोवर प्रकल्पात पाणी अडविले जात असल्याने जिल्ह्यातील बुडीत क्षेत्रातही पाणी भरले.

मणिबेलीत घरांच्या परिसरात पाणी येत असून, परत एकदा पाणी जवळ आल्याने साप, विंचू, मगर यांचे भय वाढले आहे. दुसरीकडे पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत.

चिमलखेडी येथील अर्जुन पोयरा वसावे यांच्या घरापर्यंत नर्मदेचे पाणी आले. अशीच काहीशी परिस्थिती बामणी, डनेल येथील आहे. तेथे पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली. त्यामुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहेत.

दरम्यान, सरदार सरोवराच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या अनेकांचे पुनर्वसन अपूर्ण असल्याची व्यथा विस्थापित मांडतात; पण अजूनही त्यात यश आलेले नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाणी वाढत असल्याने तेथील गावकरी रात्र जागून काढत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नर्मदा नदीवरील पाण्याची पातळी नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे.

संपूर्ण पुनर्वसन कधी होणार?

सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असलेल्यांचे पुनर्वसन हा अनेक वर्षांपासून कळीचा मुद्दा बनला आहे. पाण्याची पातळी वाढली, की तेथील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. तेथे असलेल्या जीवनशाळांच्या विद्यार्थ्यांनाही पाणी प्रवाह वाढल्याचा त्रास होतो.

त्यामुळे तेथील सर्वच कुटुंबांचे पुनर्वसन केव्हा होणार, असा प्रश्न आहे. सध्या तरी पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून राहण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT