E-KYC : शिधापत्रिकाधारकांना शासनाने ई-केवायसी करणे बंधनकारक केले असताना जिल्ह्यातील ७० टक्के शिधापत्रिकाधारकांनी केवायसी केलेले नाही. जिल्ह्यात सात लाख ९८ हजार ७०५ शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिकाधारक कुटुंबातील ३७ लाख आठ हजार २८२ सदस्यांची ई-केवायसी करण्याचे जिल्हा पुरवठा विभागापुढील लक्ष्य असून, १ जून ते ४ जुलै या महिनाभराच्या कालावधीत १० लाख सात हजार ७८७ शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली. (70 percent ration card holders in district without e KYC )
शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक केल्याने स्वस्त धान्य दुकानात नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, ई-केवायसी मशिन अनेक दुकानांत बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. ई-केवायसी बंधनकारक केल्याने नागरिक वेळ काढून स्वस्त धान्य दुकानात जात आहेत. अनेक दुकानांत स्वस्त धान्य घेताना थम्ब होते. मात्र, ई-केवायसी वेळी मशिन चालत नाही, असाही प्रकार घडत आहे. (latest marathi news)
केवायसी मशिनसंदर्भात अनेक तक्रारी येत असल्याने केवायसीची प्रक्रिया जिल्हाभरात संथगतीने सुरू आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून ई-केवायसीसंदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणीविषयी मंत्रालयात संबंधित विभागाला पत्र पाठविण्यात येईल. त्यामुळे लवकरच ई-केवायसी मशिनसंदर्भातील तक्रारी संपण्याची शक्यता आहे. पेठ तालुक्यात सर्वाधिक ४४.६९ टक्के ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे; तर सर्वांत कमी मालेगाव शहरात ७.४२ टक्के ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली.
''शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी. महिनाभरात जिल्ह्यात २७.१८ टक्के ई-केवासयी पूर्ण झाली. ई-केवायसी मशिनसंदर्भातील तांत्रिक अडचणी सोडविण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच तांत्रिक अडचणी सोडविण्यात येतील.''- कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.