Maize crop in good condition esakal
नाशिक

Nashik Agriculture News : कांदा, कपाशी, मका या ‘क’ फॅक्टरवरच मदार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे नियोजन

संदीप पाटील

विराणे : भीषण दुष्काळाने मालेगाव तालुक्यासह कसमादे परिसर होरपळून निघाला. यात शासनाने मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर केला. आजही तालुक्यात ३३ गावे व ७२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर बळीराजाने खरिपाची पेरणी केली आहे. यंदा मात्र कपाशी, कांदा, मका या पिकांवरच शेतकऱ्यांची मदार आहे. (Nashik Agriculture News)

गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत नगदी या पिकांना पसंती दिली आहे. तालुक्यासह कसमादेची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. पारंपरिक पिकांबरोबरच फळशेतीने कसमादेला मोठा हात दिला आहे. कोरडवाहू असो वा बागायती प्रत्येक शेतात वरील तीन पिके प्रामुख्याने घेतली जातात. तालुक्यातील कपाशीच्या २५ हजार ७९८ हेक्टर पैकी १८ हजार २५० हेक्टरवर ७०.७४ टक्के लागवड झाली आहे.

मका पिकाच्या ३८ हजार ८५० पैकी ३५ हजार ९४२ हेक्टरवर ९२.५१ टक्के पेरणी झालेली आहे. सध्या मिळत असलेला भाव पाहून पावसाळी कांदा लागवडीचे नियोजन सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांकडे कांदा रोप शेतात तयार होत आहेत. तालुक्यात २६ हजार ७०० पैकी २१ हजार ५५० हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. मालेगावच्या पूर्व भागातील माळमाथ्यावर कपाशीचे पीक फुलले आहे.

मका पीक पावसावर अवलंबून असते. पावसाने जास्त दिवस ओढ दिल्यास विहिरीचे पाणी द्यावे लागते. कांदा पीक तीन टप्प्यांत घेता येते. पावसाळी, रांगडा, व उन्हाळी कांदा पिकविला जातो. तिन्ही पिकांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. ८० टक्के शेतजमीन या पिकांनी व्यापलेली आहे. बियाणे, खते, मजुरी, मशागत, पेरणी, पीक काढणे, वाहतूक आदि बाबतीत तीनही पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. म्हणून या पिकांतील "क" फॅक्टर यावर्षी तारेल अशी आशा आहे. (latest marathi news)

"पूर्व मध्य माळमाथ्यातील शेतक-यांचे अर्थकारण कपाशीवरच अवलंबून आहे. नियमित पाऊस व चांगला भाव मिळाल्यास मागील वर्षाच्या दुष्काळाची भरपाई निघेल. शासनाने हमी भाव लवकरच जाहीर करावा" - समाधान साळुंके, उपसरपंच पळासदरे

"काटवन परिसरातील कांदा हे प्रमुख पीक आहे. कांदा पीक तीन वेळा वर्षातून घेता येते. परंतु दर नेहमीच स्थिर नसतात. यंदा कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा आहे. भाव मिळाल्यास दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल." - दीपक पाटील, शेतकरी वळवाडी.

"मका पीक पावसावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून मक्याने तारले आहे. वाढत्या पोल्ट्री उद्योगामुळे मक्याला मागणी वाढली आहे. अडीच ते तीन हजार रुपये भाव मिळाल्यास दुष्काळाची पोकळी भरून निघेल." - रूपाली वाणी, माजी सरपंच, गाळणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT