Police esakal
नाशिक

Nashik News : सटाणा तालुक्यात अपुरे पोलिसबळ; एका पोलिसामागे साडेहजार लोक

अंबादास देवरे

सटाणा : बागलाण तालुक्यात गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून १७१ गावांसह एक ‘क’ वर्ग नगरपालिका, मोठमोठ्या नगरांचा समावेश असलेले सटाणा शहर अशा तब्बल साडेतीन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येसाठी फक्त दोन पोलिस ठाणे व ८३ पोलिसांचे अगदीच अपुरे संख्याबळ एकूणच तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळीत आहे. (Nashik Inadequate police force in Satana Taluka)

तब्बल ४५०० लोकांमागे एक पोलिस असे राम भरोसे सूत्र असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच आघाडी शासनाच्या काळात विशेष प्रयत्न करून स्थापन केलेले सटाणा पोलिस अधीक्षक कार्यालय गेल्या दहा वर्षांपासून राजकीय हस्तक्षेपामुळे पुन्हा मालेगावला स्थलांतरित केल्याने बागलाणवासीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

सटाणा आणि जायखेडा असे तालुक्यात दोन पोलिस ठाणे आहेत. सटाणा पोलिस ठाण्याच्या कार्य कक्षेत तालुक्याचे ठिकाण असलेल्या सटाणा शहरासह ७२ गावांचा समावेश असून दीड लाखाहून अधिक लोकसंख्येची कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी एक पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, एक सहायक निरीक्षक आणि ५० पोलिस कर्मचारी आहेत.

जायखेडा पोलिस ठाण्याच्या कार्यकक्षेत ९३ गावे असून दोन लाख लोकसंख्येसाठी फक्त ३३ पोलिस कर्मचारी असून फक्त एक सहाय्यक पोलिस निरीक्षक आहेत. ४० ते ५० वर्षांपूर्वी तालुक्यातील या दोन्ही पोलिस ठाण्याच्या स्थापनेनंतर शासनाला या मंजूर पदांमध्ये कधीही वाढ करण्याची आवश्यकता वाटलेली नाही, हे तालुक्याचे दुर्भाग्य. (latest marathi news)

तालुक्याचे आराम नदी खोरे, मोसम नदी खोरे, हत्ती नदी खोरे यासह आदिवासी दुर्गम व डांग भाग तसेच सटाणा शहर आणि नामपूर ताहराबाद, जायखेडा, डांगसौंदाणे, लखमापूर, वीरगाव आणि ग्रामीण भागाचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्या तुलनेत पोलिसांचे संख्या बळ अजिबातही वाढले नाही.

त्यावेळची रहदारी, गुन्हेगारी, दंगलींचे प्रमाण पाहता ती संख्या बरोबर होती. सध्या मात्र बदललेली राजकीय परिस्थिती, उंचावलेले जीवनमान, नगदी पिकांची पीक पद्धती, भरमसाठ वाढलेली लोकसंख्या यांचा सध्याच्या पोलिसांवर अधिक भार पडत आहे. त्यामुळे अनेक गंभीर प्रकरणात किंवा काही ठिकाणी तातडीचे असतानाही पोलिस वेळेवर पोहोचू शकत नाहीत.

सटाणा शहरातून शिर्डी-साक्री राज्यमार्ग जातो. अवजड आणि खासगी वाहतुकीमुळे रोजच वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडतात. मात्र येथे अजूनही स्वतंत्र वाहतूक पोलिसांची नियुक्ती नाही. जायखेडा आणि सटाणा पोलिसांना गुजरात सीमेवर कायमस्वरूपी चेकपोस्टची आवश्यकता असताना फक्त निवडणूक आचारसंहिता काळातच नाकाबंदी होताना दिसते.

इतर वेळी कापूस व चंदनाची चोरटी वाहतूक, पाळीव, गाई, म्हशी याबरोबरच शासनाने बंदी घातलेल्या गुटखा आणि तंबाखूची ही वाहतूक करण्यासाठी हा मार्ग खुलेआम वापरला जातो. गुजरात-महाराष्ट्र सीमेलगत बागलाण तालुक्याची हद्द असल्याने पोलिसांना माहिती मिळूनही बऱ्याचदा आरोपी पकडण्यात महाराष्ट्र पोलिस अपयशी ठरतात.

दुचाकी आणि चारचाकी चोरीच्या घटनांमध्ये आरोपी गुजरात राज्यात पळून जाण्यात यशस्वी होतात. अशा गुन्ह्यांमध्ये जायखेडा किंवा सटाणा पोलिसांना परराज्यात जाणे भाग पडते. तेव्हाही तालुक्यात पोलिस बळ कमी पडते. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी दोन्हीही पोलिस ठाण्यातील पोलिस बळ वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे काळाची गरज आहे.

सटाणा पोलिस दूरक्षेत्रे डांगसौंदाणे व लखमापूर .

सटाणा पोलिस ठाण्यात कार्यरत पदे:

- पोलिस निरीक्षक - १

- पोलिस उपनिरीक्षक- २

- सहायक पोलिस निरीक्षक -३

- पोलिस कर्मचारी: ५०

( सटाण्यातील दोन पोलिस कर्मचारी उपविभागीय कार्यालयाचे काम पाहतात. उर्वरित पोलिसांमध्ये साप्ताहिक सुट्टीसाठी रोज ७/८ पोलिस जातात.)

जायखेडा पोलिस दूरक्षेत्रे: नामपूर, ताहराबाद व मुल्हेर

मंजूर पदे :

- सहाय्यक पोलिस निरीक्षक -१

- पोलिस कर्मचारी: ३३

( दोन्हीही पोलिस ठाण्यातील वर्षभरातील गंभीर प्रकरणे तपासण्यासाठी अधिक पोलिस बळाची नितांत गरज आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT